आम्हाला तुरुंगात पाठवलं, खुनी हल्ला केला तरी चालेल, पण…

0
40

द पॉईंट नाऊ ब्युरो : ईडीच्या कारवायांनी महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांचे नेते पूरते त्रस्त झाले आहेत. नुकतीच ईडीद्वारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात येऊन, त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या राऊत यांनी, ‘आम्हांला तुरुंगात टाकतील, पण 25 वर्ष तरी भाजपची सत्ता येऊ देणार नाही’ असे म्हटले आहे.

आत्तापर्यंत तपास यंत्रणांद्वारे अनिल देशमुख, नवाब मलिक, नेते मंडळींचे आप्तेष्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली. आणि आत्ता नुकतीच संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली. या सर्व बाबींमुळे राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र दिसून येत आहे.

आम्हांला तुरुंगात पाठवतील, आमच्यावर खुनी हल्ला करतील, आम्हांला ठार केले तरी आमची तयारी आहे. पण 25 वर्ष भाजपची सत्ता येऊ देणार नाही. तुम्हीच तुमची कबर खोदली आहे. असे संजय राऊत म्हणाले. आता राऊत यांच्या या प्रतिक्रियेवर भाजप काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here