तुषार रौदळ
सटाणा प्रतिनिधी ; सटाणा शहरातील विविध भागात आदिवासी बांधव अनधिकृतपणे झोपड्या उभारुण रहिवास करीत आहेत. अशा रहिवास करणाऱ्या अदिवाशी बांधवांना नगरपालिका प्रशासनाने हक्काची जागा देऊन शासनाच्या माध्यमातून घरकुले करून द्यावीत या मागणीसाठी शहरातून मोर्चा काढत पोलिस परेड मैदानावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला असुन, या मोर्चाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीने केले.
सटाणा शहरातील सुकड नाला, बस स्थानक पाठीमागील इंद्रप्रस्थ कॉलनी, चौगाव बर्डी, आराई पांधी या परिसरात आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे झोपड्या बांधून रहिवास करीत आहेत. नगर पालिकेने हक्काचे घरे मिळवून देतो या नावाखाली प्रत्येक झोपडी धारकांकडून ३०० रूपये वसूली केली असतांना ही त्यांना अद्यापपर्यंत हक्काची घरे मिळालेली नाहीत. पालिकेने घरे बांधून द्यावीत सर्व सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी संतप्त आदिवासी बांधवांनी सोमवार (ता.२९)रोजी यशवंतराव महाराज मंदीरापासून शिवतीर्थ, विंचूर प्रकाशा महामार्ग, तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी हक्काची घरे बांधून द्या, नागरी सुविधा पुरवा, अशा घोषणा दिल्यात.
मोर्चाचे नेतृत्व करणारे भाजपा शहराध्यक्ष राहुल सोनवणे, भाजपा युवामोर्चाचे तालुका अध्यक्ष मंगेश खैरणार व मोर्चातील काही प्रतिनीधींची तहसिलदार जितेंद्र इंगळे यांच्या दालनात चर्चा झाली. तहसीलदार इंगळे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, वनविभागाचे अधिकारी, पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार व इतर अधिका-यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सटाणा नगर पालिकेकडे कोणतीही शासकीय जागा अथवा पोटखराबा असलेली जागा नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जागा घेता येणार नाही असे सांगितले यावर आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला जोपर्यंत आदिवासी बांधवांना घरकुल बांधण्यासाठी पालिका प्रशासन जागा देत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्रा घेऊन उपोषणकर्त्यांनी पोलिस परेड मैदानावर आपल्या न्याय हक्कांसाठी ठान मांडले.
आंदोलनकर्त्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे राहुल सोनवणे, मंगेश खैरणार, भास्कर सोनवणे, अनिल सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गिरीश कुवर, राजेंद्र माळी, रमेश माळी, अशोक नवरे, उमाजी गायकवाड, रोशन माळी, सुरेश बोरसे, बबन पवार, अनिल पवार, रामु बागुल, मार्कंडे चव्हाण, मधुकर गायकवाड, रत्नाबाई पवार, बायटाबाई गायकवाड, लताबाई पवार, अनुबाई गवळी, केवाबाई पवार, आवळाबाई मोरे, गवलाबाई गायकवाड यांनी केले. यावेळी आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] आदिवासींना हक्काची जागा द्यावी यासाठ… […]