द पॉईंट नाऊ ब्युरो : दुसरं काही स्वस्त होवो न होवो,पण दारू मात्र स्वस्त होणारच. तसा निर्णयच महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
मद्य प्रेमींसाठी ही एक अतिशय आनंदाची अशीच बातमी आहे. महाविकास आघाडी सरकारने मद्यावरील कर कमी केला आहे. आणि तोही तब्बल 150 टक्क्यांनी. यामुळे ही मद्य प्रेमींसाठी मोठी पर्वणी असणार आहे.
येणाऱ्या ख्रिसमस आणि नववर्षाला मद्य प्रेमींना आता मद्य खूपच स्वस्त भेटणार आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय मद्य प्रेमींसाठी मोठी पर्वणीच आहे.
देशभरात पेट्रोल – डिझेलचे दर महाराष्ट्रपेक्षा खुपच कमी आहेत. दिल्ली पेक्षा तर महाराष्ट्रात पेट्रोलचे दर जवळपास 15 रुपयांनी जास्त आहेत. मात्र त्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार काहीही बोलायला देखील तयार नाही. आणि इथे मद्याच्या बाबतीत मात्र तात्काळ निर्णय घेतला ही गेला. महाविकास आघाडी सरकारच्या दृष्टीने हा नेमका कोणता ‘महाविकास’ असा सवाल महागाईने त्रस्त सामान्यांनी केला आहे.
सध्या मद्य विक्री दुकानांमध्ये जुना मद्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे तो जुन्याच दरात विकला जाईल. मात्र आता ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नवा साठा मद्य दुकानांमध्ये आणला जाईल. आणि तो मद्य प्रेमींना स्वस्त दरात मिळेल. त्यामुळे मद्य प्रेमींसाठी ही एक चंगळच आहे.
महाविकास आघाडी सरकारने या प्रकारचा निर्णय दुसऱ्यांदा घेतला आहे. याआधी देखील विदेशी मद्यावरील कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय महाविकास मात्र फक्त मद्य प्रेमींचाच करणार आहे. या प्रकारे निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकार एक प्रकारे मद्य प्रेमींना प्रोत्साहन देत आहे. असेच दिसून येते.
केवळ राज्याच्या तिजोरीत भर पडावी, असे जर कारण महाविकास आघाडी सरकार द्वारे दिले जात असेल. तर ते केवळ एक मिथ्या आहे, असेच म्हणावे लागेल.
राज्यात राहणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी शासनाने काम करायला हवे. मात्र इथे महाविकास आघाडी सरकारने वेगळाच धडाका लावला आहे. अनेक जीवनावश्यक गोष्टी महाग झाल्या असतांना, महाविकास आघाडी सरकारने हा मद्यावरील कर कमी करण्याचा निर्णय कोणत्या दृष्टीने घेतला? हे मात्र निरुत्तरीत आहे. या प्रकारच्या निर्णयात सामान्यांचे तर मरण आहेच, पण त्याचबरोबर मद्य प्रेमींसाठी हा एक प्रोत्साहन देणारा निर्णय आहे. जिथे प्रोत्साहन द्यायला हवे, तिथे मात्र महाविकास आघाडी सरकार प्रोत्साहन देत नाही.
आता महा’विकास’ आघाडी सरकारचा हा नेमका कोणता आणि कोणाचा विकास हे तर सर्वांच्या स्पष्ट नजरेत दिसून येते आहे. हे सरकार इंधनाचे दर कमी करायला सांगितले, तर अनेक कारणे देते. मात्र मद्याच्या बाबतीत अशा प्रकारचा निर्णय घेऊन सामान्यांच्या जखमेवर मात्र मीठ चोळले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
सरकारमध्ये असणारे लोकांचे वाईन शॉप असतील…विक्री वाढवायला tax कमी केले असतील.
[…] […]