द पॉईंट नाऊ ब्युरो : पुण्याच्या शिरूर मध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे भाषण सुरू असतांना अचानक अजान सुरू झाले. त्यामुळे वळसे पाटील यांनी आपले भाषण थांबवत सर्वांना शांत राहण्यास सांगितले. त्यांच्या या कृतीने सगळ्यांचेच लक्ष त्याकडे वेधले गेले आहे.
नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील स्पीकर हटवण्याची मागणी केली होती. आणि हटवले नाही तर हनुमान चालिसा मोठ्या आवाजात लावू असा इशारा दिला होता. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावल्याने वाद उभा राहण्याची शक्यता होती.
आता दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात केलेल्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वळसे पाटील यांच्या या कृतीमुळे दोन विरोधी बाबी दिसून आल्या. यामुळे दिलीप वळसे पाटील यांची ही कृती मनसे साठी टोला तर नाही ना, अशी चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसा लावण्याच्या इशाऱ्यानंतर कारवाईचा इशारा दिला होता. त्यावर आधी गृहमंत्र्यांनी न्यायालयाने सांगितलेला आदेश पाळावा. मशिदींवरचे भोंगे उतरवावेत. असे मनसेने म्हटले होते.
आता दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे येथील या कृतीनंतर मनसे यावर काही प्रतिक्रिया देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम