राज्यात कोरड्या हवामानाने, नागरिकांना मिळाला दिलासा

0
22

राज्यात उन्हाचा झळा चांगलाच वाढल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उष्ण लाट आली आहे. तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याने नगर येथेही उष्ण लाट होती. दिवसभरात कोणाचा काही ठिकाणी चांगलाच तडाखा बसलेला आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते.

आज ता. ३० राज्यात उष्ण व मुख्यतः कोरड्या हवामान अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ ४ मे रोजी चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. ५ मेपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत त्याची तीव्रता वाढत जाण्याचे संकेत आहेत. मध्य प्रदेशपासून, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात उन्हाळ्याच्या दिवसातही ढगाळ हवामानासह पावसाला पोषक हवामान आहे.

यवतमाळ, धुळे, अमरावती, नागपूर या ठिकाणीदेखील उन्हाची ताप असह्य झाली आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज राज्यात कमाल तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमानातही वाढ झाली असून, दिवस रात्रीच्या उकाड्यात वाढ झाली आहे.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here