वरवंडीत स्मार्ट गावं समितीचे स्वागत ; तालुक्यातील पाच गावांना भेट

0
45
वरवंडी येथे स्मार्ट ग्राम समितीचे औक्षण करतांना महिला समवेत ग्रामसेविका. सरिता मिस्तरी आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : स्मार्ट ग्राम योजनेंर्तगत तालुक्यातील वरवंडी, वार्षी,शेरी, वाजगाव व विठेवाडी येथे मंगळवारी ( दि.१७) रोजी या गावांना तालुका बाहेरील समितीने भेट देऊन पाहणी केली . शासनाच्या वतीने निकषात बसणाऱ्या सुंदर गावांना १० लाख रुपयांचे बक्षीस देऊन संबधीत गावाला स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

वरवंडी येथे स्मार्ट ग्राम समितीचे औक्षण करतांना महिला समवेत ग्रामसेविका. सरिता मिस्तरी आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

यासाठी तालुक्यातील वरवंडी, वार्षी, शेरी, वाजगाव व विठेवाडी या गावांना मंगळवारी समितीने भेट देऊन पाहणी केली. यासाठी ठरून दिलेल्या निकषात कोणत्या गावाची निवड होते. हे लवकरच कळणार आहे. या समिती मध्ये नांदगावचे गटविकास अधिकारी जी पी चौधरी , सहायक गटविकास अधिकारी एस डी दळवी ,आदींसह डी एस मांडवडे , विस्तार अधिकारी बी एस बोरसे साहेब , कृषी, कृषी विस्तार अधिकारी एस के तुपे , एस एम जोशी ,एस बी मोहिते यांचा समावेश होता.

यावेळी देवळ्याचे गटविकास अधिकारी राजेश देशमुख , विस्तार अधिकारी जयवंत भामरे उपस्थित होते . वरवंडी गावात आलेल्या समितिचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले. याप्रसंगी सरपंच भाऊदास गवळी , उप सरपंच . भरत शिंदे, ग्रा पं सदस संदीप बच्छाव , ग्रामसेविका. सरिता मिस्तरी आदींसह रवींद्र वाघ, विलास शिंदे, प्रकाश बच्छाव, महेश वाघ , रावसाहेब शिंदे, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here