Shirdi| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काकड या गावात जनसभा आयोजित करण्यात आली होती. पण, त्याआधीच ह्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या काही नागरिकांनी भरलेल्या एसटी बसेसच्या काचा फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मंगरूळ येथे हि घटना घडली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यभरात चांगलाच पेटलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला जाणाऱ्या गाड्यांना व बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे बसेसचे मोठे नुकसान झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर दौऱ्यावर असून शिर्डी दर्शनासह येथील अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. सोबतच, शिर्डी विमानतळाजवळील काकड या गावात त्यांच्या जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून नागरिकांना सभास्थळी आणले जात आहे. एसटी महामंडळाच्या बसेसची यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. याच बस नागरिकांना घेऊन येत असताना बसेसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात मंगरूळ येथे हि घटना घडली आहे.
Maharashtra | हंगाम सुरू होण्यापूर्वीच मोठा झटका; राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याचे आदेश
सभेला जिल्हाभरातून नागरिकांना कार्यक्रम स्थळी आणण्यासाठी १००० गाड्यांची सोय करण्यात आली आहे. या गाड्या ज्या गावोगावी जात आहेत, त्या ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान, शेवगाव तालुक्यात मठाची वाडी आणि भातपूर या ठिकाणी बस पाठवण्यात आल्या असताना संबंधित गावातील नागरिकांनी या गाड्या माघारी पाठवल्या आहेत. त्यांनतर आता याच परिसरातील मराठा समाज आक्रमक झाला असून मंगळूर येथील नागरिकांनी तर थेट सभास्थळी नेण्यासाठी जात असलेल्या बसेसच्या काचा फोडल्याचे समोर आले आहे. ‘जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या कार्यक्रमाच्या दरम्यान मराठा आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर करावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येते आहे.
गाड्या परत पाठवल्या…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगर दौऱ्यादरम्यान काकड गावात आयोजित सभेसाठी नागरिकांना घेण्यासाठी आलेल्या बस परत पाठवण्यात आल्या आहेत. गावबंदी असल्यामुळे शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील मराठा समाजाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मंत्री विखे यांच्या कुटुंबीयांविरोधात मठाचीवाडी येथील मराठा समाज आक्रमक झाल्याचीही माहिती समोर आली आहे. शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव येथेहि मोदींच्या सभेसाठी जाणाऱ्या बस अडवण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक गावांत नेत्यांना गावबंदी केली जात आहे. दरम्यान, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांची गाडी देखील अडवून त्यांनादेखील जाब विचारण्यात आला असल्याची माहिती आहे.
political| भाजपला मोठा धक्का..! बडा नेता कॉंग्रेसच्या वाटेवर…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम