मुंबई – राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता बरेच सक्रीय झाले आहेत. मातोश्रीवर पक्षाच्या बैठकांचे सत्र असो, की राज्यातील शिवसैनिकांची भेटीगाठी असो. उद्धव ठाकरे नियमितपणे तिथे उपस्थित राहतात. त्यातच त्यांनी आता पुन्हा एकदा “सामना” ह्या शिवसेनेच्या वृत्तपत्राचे मुख्य संपादकपद आपल्या हाती घेतले आहे.
नोव्हेंबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवली होती. मात्र सत्तेतून पायउतार झाल्यानंतर गेल्या महिनाभरात घडलेल्या पक्षांतर्गत संघर्ष, तसेच मागील आठवड्यात नेते संजय राऊत यांना ईडीने केलेल्या अटकेची पार्श्वभूमी बघता सामनाची जबाबदारी उद्धव यांनी पुन्हा एकदा आपल्याकडे घेतलेली आहे. त्यानुसार वृत्तपत्राच्या आजच्या अंकात संपादक म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव छापण्यात आले आहे. वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे असतील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम