द पॉईंट नाऊ ब्युरो : मुंबईमध्ये बीचवर पोहायला गेलेल्या तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबई येथे जुहू चौपाटीवर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
चेंबूर परिसरातील चार मुले जुहू चौपाटीवर पोहायला गेलेली होती. त्यातील 21 वर्षीय आनन सिंह, 18 वर्षीय कौस्तुभ गुप्ता व 16 वर्षीय प्रथम गुप्ता यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
चेंबूर येथील चौघे मित्र पोहायला आले असता, लाईफ गार्डने त्यांना आत जाण्यास मनाई केली होती. मात्र त्यांनी लाईफ गार्डचे न ऐकता ते आत लाटांमध्ये पोहोण्यास गेले. आणि त्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. तर अशा प्रसंगी लाईफ गार्ड कुठे जातात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बीचवर पोहायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र वारंवार बजावून देखील तरुणाई स्टंटबाजी करण्याच्या मोहात पडते. या स्टंटबाजीच्या नादात दुर्दैवी घटना घडतात. याआधी देखील अशा घटना घडून गेल्या आहेत. आणि आता पुन्हा तिघांना आपला जीव गमवावा लागला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम