द पॉईंट नाऊ: अकोला जिल्ह्यातील सांगोला गावात गेल्या ३०० वर्षांपासून रावणाची बुद्धी आणि तपस्वी गुणांची पूजा करण्याची परंपरा गावात सुरू आहे. येथे विजयादशमीला राक्षस राजाची आरती केली जाते.
एकीकडे देशभरात ठिकठिकाणी रावण, मेघनाद आणि कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन करतात. त्याच बरोबर महाराष्ट्रात एक असे गाव आहे जिथे दसरा काहीशा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. येथे राक्षस राजाची आरती केली जाते. अकोला जिल्ह्यातील सांगोला गावातील अनेक रहिवासी असे मानतात की ते रावणाच्या आशीर्वादामुळे काम करतात, त्यामुळे ते आपला उदरनिर्वाह करू शकतात आणि राक्षसराजामुळे त्यांच्या गावात शांतता आणि आनंद आहे.
३०० वर्ष जुनी परंपरा
गेल्या ३०० वर्षांपासून गावात रावणाची बुद्धी आणि तपस्वी गुणांची पूजा करण्याची परंपरा सुरू असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात १० डोकं असलेली रावणाची उंच काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. स्थानिक रहिवासी भिवाजी ढाकरे यांनी बुधवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर सांगितले की, गावकरी प्रभू रामाला मानतात, पण रावणावरही विश्वास ठेवतात आणि त्याचा पुतळाही जाळला जात नाही.
दूरदूरवरून लोक येतात, स्थानिक लोकांनी सांगितले की, या छोट्या गावात दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी लंकेच्या राजाची मूर्ती पाहण्यासाठी आणि काहीजण पूजा करण्यासाठी येतात. सांगोला येथील रहिवासी सुबोध हातोळे यांनी सांगितले की, महात्मा रावणाच्या आशीर्वादाने आज अनेक लोक गावात काम करत आहेत. दसऱ्याच्या दिवशी गावकरी महाआरती करून रावणाच्या मूर्तीची पूजा करतात. ढाकरे यांनी सांगितले की काही गावकरी रावणाचला विद्वान मानतात आणि त्यांना वाटते की त्याने राजकीय कारणांसाठी सीतेचे अपहरण केले आणि तिची पवित्रता राखली.
गावात सुख, शांती रावणामुळेच आहे.स्थानिक मंदिराचे पुजारी हरिभाऊ लखडे म्हणाले की, देशभरात दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, जे वाईटावर चांगल्याचा विजय असल्याचे द्योतक आहे. सांगोला येथील रहिवासी ज्ञान आणि तपस्वी गुणांसाठी लंकेच्या राजाची पूजा करतात. लखडे म्हणाले की, त्यांचे कुटुंब दीर्घ काळापासून रावणाची पूजा करत आहे आणि लंकेच्या राजामुळेच पुढील सुख, शांती आणि समाधान आहे, असा दावा केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम