द पॉईंट नाऊ ब्युरो : रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने 6 मुलांना विहिरीत फेकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यात सहाही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर महिलेचा जीव वाचला आहे.
रायगड जिल्ह्याच्या ढालकाठी बिरवाडी येथील नवरा-बायकोच्या भांडणाचे दुष्परिणाम 6 मुलांना भोगावे लागले असे बोलले जात आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. येथील चिखुरी साहनी या बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीचे त्याची पत्नी रुणाशी सतत भांडण होत होते. तो दारू पिऊन त्याच्या बायकोला मारहाण करत होता. आणि याच कारणातून त्याची बायको रुणाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पाच मुली आणि एका मुलाला आपला जीव गमवावा लागला. रोशनी, करिश्मा, रेश्मा, विद्या, राधा आणि शिवराज अशी जीव गमवावा लागलेल्या लहानग्या मुलांची नावे आहेत. रुणा हिने या मुलांना फेकून स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र यात ती वाचली तर मुलांना आपले प्राण गमवावे लागले.
दरम्यान, रेस्क्यू टीमच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता या घटनेमागे नक्की कारण काय, याचा पोलीस तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम