The village is for sale: माळवाडी गाव विकणे आहे

0
42
शेत मालाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्त गाव विक्रीचा ठराव करण्यासाठी जमलेले शेतकरी व महिला ( छाया -सोमनाथ जगताप )

The village is for sale : संपूर्ण माळवाडी गाव विकणे आहे. याचा ठराव करण्यासाठी आज बहुतांश शेतकरी ,महिला सोमवारी (दि ६) रोजी सकाळी ११ वाजता गावातील सभामंडपात उपस्थित होते. तसा ठराव करण्यात येऊन .तो केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अविनाश बागुल यांनी दिली. शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे ठाकले आहे . (The village is for sale)

शेत मालाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्त गाव विक्रीचा ठराव करण्यासाठी जमलेले शेतकरी व महिला ( छाया -सोमनाथ जगताप )

Happy birthday Dadasaheb: निवडुन आल्यास आमदार म्हणुन नाहीतर सालदार म्हणुन काम करेल अन् ती घोषणा ठरली खरी

तालुक्यातील माळवाडी गावात सुमारे ५३४ हेक्टरवर शेतकरी आपला शेती व्यवसाय करत आहेत. त्यात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि नगदी प्रमुख पीक कांद्याचे घेतले जात आहे. यात गेल्या ३ ते ४ वर्ष्या पासून कोणत्याही शेती उत्पादित मालाला फुटी कवडीही दाम मिळत नाही आहे.

LIC Policy: LIC च्या या योजनेत गुंतवणूक करा, तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करा, जाणून घ्या फायदे

माळवाडी आणि फुलेमाळवाडी गांवासह देवळा तालुक्यातील कांदा या प्रमुख पिकावर शेतकरी आपला उदरनिर्वाह व भविष्य बघत आहे, यात शेतकरी कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, लग्न आणि मुख्य म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाही शेती व्यवसायात उपल्बध होत नाही आहे.

तसेच दैनंदिन गरजा व खाजगी सरकारी बँक कर्ज चुकती करण्यासाठी आज रोजी तर कुठलाही पर्याय उरला नसल्या कारणाने माळवाडी येथील संपूर्ण शेतकरी एकत्रित येऊन संपूर्ण गाव विकिण्याचे ठरवले जात आहे. याकडे शासनाने शेतकऱ्याच्या गरजा भावण्यासाठी व कर्ज मुक्त करण्याइतके शेती उत्पादित मालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे ते सरकाने विकत घेण्याची मागणी शेतकरी प्रवीण बागुल, अमोल बागुल, राकेश सोनवणे , अविनाश बागुल आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

माळवाडी गावातील ९५% शेतकरी कांदा उत्पादक आहेत , हे शेतकरी ग्रामस्थ मिळून शेती व्यवसायातून मोबदला मिळत नसल्याने येथील शेतकरी ,महिला सोमवारी (६) रोजी गाव विक्रीचा ठराव करण्यासाठी जमले होते. या ठरावासाठी अमोल बागुल, प्रवीण बागुल, राकेश सोनवणे, अविनाश बागुल , अक्षय शेवाळे, आदींनी सभा आयोजित करून सर्वानुमते तसा ठराव पास करून सर्व शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या आहेत.

कुठल्याही शेती मालाला भाव नाहीत, म्हणून उदरनिर्वाहासाठी आत्महत्या करण्यापेक्षा जमिनी विकून जगता यावे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी गाव विकण्याचा एकमताने ठराव करीत आहोत. यात केंद्र राज्य शासनाने आमच्या जमिनी घेऊन आम्हला पैसे उपल्बध करून घ्यावेत.
सुशिक्षित बेरोजगार शेतकरी प्रवीण बागुल, माळवाडी ता देवळा, जि नाशिक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here