नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने धार्मिक नाव आणि चिन्हे यांचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. ह्यावर कोर्टाने नोटीस बजावत निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला येत्या ४ आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहे.
राजकीय पक्षांकडून अनेकदा धार्मिक नावांचा आणि चिन्हांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच मुद्द्यावरून याचिकाकर्ते वसीम रिझवी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत यावर आक्षेप नोंदवला आहे. जर धर्माच्या नावावर मते मागणे बेकायदेशीर असेल तर पक्षाचे नावही धर्माच्या आधारावर असू शकत नाही. असे मत याचिकाकर्ते रिझवी यांनी व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि हिंदू एकता दल या पक्षांचे उदाहरण दिले आहे.
याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे वकील गौरव भाटिया यांनी न्यायालयात सांगताना राजकीय पक्षांच्या भांडणात चंद्र-ताऱ्यांचा वापर थांबवावा आणि अशा पक्षांना निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची मागणी केली. यावर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला ४ आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम