Samruddhi mahamarga accident : बुलढाण्यातील अपघाताच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर…

0
25

Samrudhi accident : बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे झालेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. नागपुरहून विदर्भ ट्रॅव्हल्स ही बस समृद्धी महामार्गावरुन पुण्याकडे येत होती. मात्र शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास बस महामार्गाच्या पुलावरील दुभाजकाला धडकली. या धडकेनंतर बसमधील डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतला. काही क्षणातच बसने पेट घेतल्याने २६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरूवातीला बसचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे चालकाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता अमरावती परिवहन विभागाने या अपघाताबाबत महत्त्वाची माहिती दिली.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या अहवालात काय आलं समोर

ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, ही बस उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी पोलवर जाऊन आढळली. यामुळे ड्रायव्हरचे संतुलन बिघडले व चालकाच्या उजव्या बाजूचे चाक दुभाजकावर आदळले. यामुळे बसचे एक्सेल तुटले आणि बसचा डिझेल टँक फुटला. बसचे एक्सेल तुटल्यामुळे बस सिमेंट रोडवरून घसरत गेली. त्यानंतर आधीच गरम असलेल्या इंजिन ऑइलने पेट घेतला. एका क्षणात संपूर्ण बसणे पेट घेतला. बस डाव्या बाजूने उलटल्याने बसचे इमर्जन्सी दरवाजे उघडता आले नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याचे असे प्रत्यक्षदर्शीयांना कुठेही आढळले नाही. कारण कुठेही टायरचे तुकडे पडलेले दिसले नाहीत. तसेच अतिवेगामुळे अपघात झाल्याचे देखील कुठेही आढळले नाही. ही बस रात्री ११.०८ मिनिटांनी समृद्धी महामार्गावर आली आणि १.३२ मिनिटांनी हा अपघात झाला. या बसने १५२ किलोमीटर अंतर दोन तास २४ मिनिटांमध्ये पार केले होते. तर बसचा वेग हा ७० किलोमीटर प्रति तास होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यादृष्टीने गृहविभागाकडून अपघाताची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिली असून अपघातात मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here