
देवळा | सोमनाथ जगताप
शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या व उत्तमोत्तम विद्यार्थी घडविण्याची परंपरा असलेल्या येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुल देवळा ह्या माध्यमिक विद्यालयात सन१९८६ मध्ये दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे (दि २६) रोजी आयोजन केले होते. तब्बल ३७ वर्षानी हे सर्व वर्गमित्र मैत्रिणींनी एकत्र येत आपल्या गुरूजनांच्या साक्षीने उत्साहात स्नेह मेळावा साजरा केला. यावेळी विद्यालयाला सर्वांनी भेट दिली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सन १९८६ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांना ग्रुपवर संघटीत करून हा स्नेहमेळावा आयोजित करण्याचे आवाहन हेमा आहेर, कैलास केदारे, नाना रणधीर, अजय मेतकर, पोपट सूर्यवंशी आदींनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वजण स्नेह मेळाव्यासाठी एकत्र जमले.
शिवाजी मराठा इंग्लिश स्कुल येथे संपन्न झालेल्या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर होते. यावेळी नंदू खरोटे, पी टी वाघ ,अरुणा पगार,उत्तम चव्हाण ,नरेंद्र शिरसाठ ,डॉ मालती आहेर आदि गुरूजन उपस्थित होते. कैलास केदारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रथम दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. हेमा आहेर यांनी आभार मानले
सर्व शिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
शालेय जीवनात घडलेल्या गंमतीजमतीच्या आठवणींना उजाळा देत तसेच जीवनात आलेले विविध अनुभव कथन करून विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अनेक वर्षांनंतर सर्व वर्गमित्र एकञित आल्याने वातावरण भारावून गेले होते. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सकाळपासून संध्याकाळपर्यंत जुन्या आठवणींना उजाळा, ओळख परेड, व शाळेविषयी जुन्या आठवणींना उजाळा दिला.शालेय जीवनातील गमतीजमती ऐकतांना सर्व जण भूतकाळात हरवून गेले.
Ajit pawar: ‘शेतकरी त्रस्त आणि शिंदे सरकार मस्त’, अजित पवारांचा हल्लाबोल
उपस्थित गुरूजनांनी या मेळाव्याच्यानिमित्ताने मार्गदर्शन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.
यावेळी. नरेंद्र सिरसाठ म्हणाले विद्यालयाच्या सन ८६ च्या बॅचमधील आमचे विद्यार्थी चांगल्या संस्कारांची शिदोरी घेऊन वाटचाल यशस्वीपणे चालू असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे सांगून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. अरुणा पगार यांनी मैत्रीचे धागे पुन्हा घट्ट केल्याबद्दल सर्वांचे कौतुक करून जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
गेट टुगेदरची हि संकल्पना अतिशय चांगली असून सेवानिवृत्त झाल्यानंतर ती राबवण्यापेक्षा वयाच्या चाळीशीत असतांनाच ती राबवली गेली तर सर्वांसाठी ती अधिक फायदेशीर ठरू शकते असे प्रतिपादन नंदू खरोटे यांनी केले.
स्नेहमेळाव्यास केदा आहेर,सुनील आहेर, महेंद्र देशपांडे, राजेश देशमुख, महेश सोनकुळे, नितीन शेवाळकर, बंडू आहेर, जयश्री मंडलेचा, सोनाली चव्हाण ,मीनाक्षी जाधव , सुधीर मांडगे ,शरद आहेर ,केदारनाथ मेतकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम