
देवळा ; खर्डे ता देवळा येथील प्रगतिशील शेतकरी सखाराम आण्णा जाधव यांच्या रक्षा विसर्जनाची राख खड्ड्यात टाकून त्यात वृक्षारोपण करण्यात आले . रक्षा विसर्जनाची राख नदीच्या पाण्यात टाकली जाते .यामुळे पाणी प्रदूषित होते .

आता राख नदीच्या प्रवाहात न टाकता त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ खड्ड्यात टाकून त्यावर वृक्षारोपण करण्यात येत आहे . अशाच प्रकारे खर्डे ता देवळा येथील प्रगतिशील शेतकरी सखाराम मोहन जाधव (८१) यांचे नुकतेच निधन झाले . त्यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमानंतर स्मशानभूमीतुन जमा केली रक्षा मळ्यात नेत खड्डा खोदून टाकत वृक्षारोपण केले . मृत व्यक्तीची रक्षा पाण्याच्या प्रवाहात न सोडता वृक्षारोपनाच्या माध्यमातून खड्ड्यात टाकली जात असल्याचा आता सर्वत्र पायंडा पडल्याचे दिसून येते असून,
या माध्यमातून नदी प्रदूषित होण्यास मदत असून, मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात येऊन त्यानिमित्ताने कुटुंबाकडून एक आठवण म्हणून त्या वृक्षाच्या संगोपणासाठी देखील मदत होते. यावेळी जाधव यांचे चिरंजीव माणिक जाधव , जावाई नामदेव शिंदे आदींसह पत्नी सून, मुली , नातवंडे , पुतणे डॉ जगदीश जाधव उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम