द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राज्यात राजकीय समीकरण वेगाने बदलत असून कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा सेनेचा बालेकिल्ला असल्याने गेल्यावेळी काही फरकाने सेनेचा निसटता पराभव झाला, व काँग्रेस विजयी झाले काँग्रेस आमदाराच्या निधनाने पुन्हा पोटनिवडणुक रंगणार आहे. महाविकासआघाडी असल्याने ही जागा काँग्रेसला सोडल्याने यात सेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर नाराज झाले असून त्यांचा फोन नॉटरीचेबल असल्याने शंका वाढली असून, त्यात भाजपाचा उमेदवार देखील गुलदस्त्यात असल्याने सोशीलमीडियावर सेनेच्या फुटीची शंका बळावली आहे.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला ही जागा सोडल्याचे शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी घोषणा झाल्यानंतर काही तासातच शिवसेनेतील (shivsena) नाराजी नाट्य चव्हाट्यावर आले आहे. या मतदारसंघातील सेनेचे मा. आमदार व राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar)यांचा फोन बंद असून ते ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. क्षीरसागर यांनी ही पोटनिवडणूक लढवण्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्याने त्यांनी जोमात तयारी केली होती. पण, हा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी तर्फे काँग्रेस लढणार असल्याचे शुक्रवारी रात्री स्पष्ट झाले. शिवसेनेतील नाराजी प्रकर्षाने पुढे आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने स्थानिक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शिवसैनिकांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. तसेच, या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले राजेश क्षीरसागर हे शुक्रवारी रात्रीपासूनच नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. भाजपच्या गोटात जाणार का उची चर्चा देखील सुरू झाली आहे.
कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ शिवसेना-भाजपची युती असताना शिवसेना लढवत होती. याच मतदारसंघातून क्षीरसागर आमदार होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत जाधवांकडून त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेचा परंपरागत असलेला हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा, अशी मागणी कोल्हापूर शिवसेनेकडून प्रखर होती. नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली हा मतदारसंघ सेनेने काँग्रेससाठी सोडला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत आता शिवसेनेला संधी मिळावी, असा सूर होता.
काँग्रेसने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला नाही तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवागनी द्यावी, अशी मागणी खुद्द राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष क्षीरसागर यांनी केली होती. मात्र, ही मागणी पूर्ण झाली नाही, त्यामुळे कोल्हापूरमधील शिवसेनेत नाराजी आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्या पत्नीचे नाव आघाडीवर आहे. तसेच, मालोजीराजे यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीकडे कोल्हापूरचे लक्ष आहे.
भारतीय जनता पक्षाने सत्यजित कदम, महेश जाधव यांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवली असल्याची माहिती आहे. मात्र, भाजपकडून अजून कोणाचेही नाव अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. त्यातच क्षीरसागर फोन बंद करून आहेत यामुळे ते भाजपच्या तंबूत तर जाणार नाहीत ना हे गूढ वाढले आहे. कारण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये पंढरपूर पॅटर्न राबविण्याबाबत सूतोवाच केले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम