Rain Update | राज्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला त्यामुळे कमी मॉन्सूनचा फटका यंदा बसणार आहे. मात्र आता अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आलेला आहे. राज्यातील सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झालेला असून कोकणालाही या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांत दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केलेली होती. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरलेला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. या पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला आहे. राज्यातील भात आणि द्राक्षाला या अवकाळीचा फटका बसणार आहे. मात्र रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण अचानक आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झालेला आहे.
नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी झाली जाहीर
शेतकऱ्यांचे हाल
तळकोकणात मंगळवारी रात्री वातावरणात बदल होऊन अचानक पाऊस सुरु झाला. या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्येच अडकलेला आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील वातावरण बदलामुळे द्राक्ष बागायतदारांना सुद्धा या वातावरणाचा जबरदस्त फटका बसलेला आहे. या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता संकटात सापडलेला आहे.
Nashik | जिल्ह्यातील पाणीप्रश्न सध्या ऐरणीवर; नोव्हेंबरमध्येच ३४० गावांना टँकरने पाणीपुरवठा
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार
कोल्हापूरच्या राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात बुधवारी पहाटे जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांनी मळणीसाठी भात पिक शेतात ठेवला होता. त्याचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम