देवळा ; येथील जुन्या तहसिल कार्यालयासमोर सोमवारी (दि 2) रोजी उमराणा बाजार समितीत विकलेल्या कांद्याचे पैसे मिळावेत म्हणून प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी राहुट्या टाकुन अनोखे उपोषण केले .

सायंकाळी उशिरा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले . याबाबत सविस्तर माहिती अशी की , सन १७/१८ मध्ये उमराणा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी कांदा विकला होता ,नोटा बंदीचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ केली होती.
अंदाजे चार कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी अनेक वेळा बाजार समिती प्रशासन, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जिल्हा उप निबंधक, पणन संचालक पुणे, सहकार मंत्री, यांच्या कडे लेखी पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे, त्याप्रमाणे कार्यवाही झाली . परंतु अद्याप कोणतीही थेट कारवाई करण्यात आलेली नाही, संबंधित व्यापाऱ्यांच्या मालमत्तेची जप्ती करुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे थकित पैसे अदा करण्यासंबंधी प्रशासन विभाग व सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून टाळाटाळ व दिरंगाई होत असल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून आमचे पैसे मिळावेत यासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय दहीवडकर यांच्या नेतृत्वाखाली राहुट्या टाकुन लक्षवेधी उपोषण करण्यात आले.
शेतकऱ्यांनी दीलेल्या इशा-यानुसार आज सोमवार( दि १२) रोजी स्व निवॄती काका देवरे कॄषी उत्पन्न बाजार समिती उमराणे येथिल नोटबंदी काळातील व्यापा-यांनी थकविलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत या मागणीसाठी भर पावसात थकबाकीदार कांदा उत्पादक शेतकरी राहुटी आंदोलनात सहभागी झाले होते .
यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष कॄष्णा जाधव , कार्याध्यक्ष दशरथ पुरकर ,उपतालुकाध्यक्ष हरी सिंग ठोके ,शेतकरी चिंधा सोनवणे ,दिलिप अर्जुन सोनवणे ,कडू मन्साराम देवरे ,जगन्नाथ सोनवणे,रामदास बागुल ,श्रावण रामभाऊ ्नवनाथ साळुंखे ,जिभाऊ वाघ, बिबाबाई जिभाऊ देवरे,यांसह कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने, राज्य संपर्क प्रमुख कुबेर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट, देवळा बाजार समितीचे संचालक योगेश आहेर आदीनी उपस्थित राहुन पाठींबा दिला .
यावेळी वाघ्या मुरळी पथकाने उमराणा बाजार समिती प्रशासन,व व्यापाऱ्यांची अब्रू वेशीवर टांगत मुरली गित सादर केली, त्यामुळे या अनोख्या पध्दतीने केलेल्या आंदोलनाला उंदड प्रतिसाद मिळाला, जो पर्यंत व्यापाऱ्यांनी थकवले पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचे प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय दहीवडकर यांनी ठामपणे सांगितले, येत्या पंधरा दिवसांत जर शेतकऱ्यांचे पैसे नाही मिळाले तर मंत्रालयासमोर आंदोलन उभे करु असा इशाराही संजय दहीवडकर यांनी दीला आहे.
यावेळी सायंकाळी उशिरा नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी भर पावसात आंदोलन स्थळी भेट देऊन व्यापाऱ्यांवर केलेल्या कारवाईची माहिती दिली,व आज अखेर ७० %रक्कम वसुल करुन थकीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असल्याचे सांगितले, तरी आपण. राहुटी आंदोलन मागे घ्यावे असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी उमराणा, दहीवड, मेशी, डोंगरगाव, पिंपळगाव वाखारी परीसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम