पाकिस्तान 147 धावांवर ऑलआऊट; भारताचा आत्मविश्वास वाढला

0
24

दुबईत खेळल्या जात असलेल्या आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम खेळून भारताला 148 धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तानचा संघ 19.5 षटकात 147 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 43 धावा केल्या. मात्र, तो अतिशय संथपणे खेळला. त्याचवेळी भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या यांनी भारतासाठी अप्रतिम गोलंदाजी केली. हार्दिकने चार षटकांत केवळ २५ धावा देत तीन बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमारला एकूण चार यश मिळाले.

नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना पाकिस्तानला सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले. त्यामुळे संपूर्ण संघ 19.5 षटकांत 147 धावांत गारद झाला. भुवनेश्वर कुमारने बाबर आझमला बाद करून पाकिस्तानला पहिली यश मिळवून दिली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी तगड्या आणि सरळ गोलंदाजीने पाकिस्तानला बॅकफूटवर ठेवले. भुवीने चार आणि हार्दिक पांड्याने तीन बळी घेतले.

भारताने पाकिस्तानला एक चेंडू बाकी असताना ऑलआऊट केले. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 43 आणि इफ्तिखार अहमदने 28 धावा केल्या. याशिवाय शाहनवाज दहानीने 16 आणि हारिस रौफने 13 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार आणि हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंगला 2 आणि आवेशला एक विकेट मिळाली.

पाकिस्तानच्या विकेट अशा पडल्या
1.   बाबर आझम (10 धावा), 15-1
२.   फखर जमान (१० धावा), ४२-२
३.   इफ्तिकार अहमद (२८ धावा), ८७-३
४. मोहम्मद रिझवान (४३ धावा), ९६-४
५. खुशदिल शाह (२ धावा), ९७-५
6. आसिफ अली (9 धावा), 112-6
7. मोहम्मद नवाज (1 धाव), 114-7
८. शादाब खान (१० धावा), १२८-८
9.  नसीम शाह (0 धावा), 128-9
१०. शाहनवाज दहनी (१६ धावा), १४७-१० .

भारतासमोर 148 धावांचे लक्ष्य
पाकिस्तानने भारताला विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य दिले आहे. पाकिस्तानी संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर पाकिस्तानचा शेवटचा विकेट म्हणून शाहनवाज डहानी बाद झाला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here