Onine news : बळीराजा हट्टाला पेटणार ; प्रत्येक मिनिटाला आता राज्यातील आमदारांचे फोन वाजणार

0
88

Onine news : काही महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरून काढण्यासाठी भरपाई देण्याचं शासनाकडून मान्य करण्यात आलं होतं. मात्र चार महिने उलटूनही शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याने संतप्त कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने आमदारांना फोन करून हैराण करण्याची अनोखी मोहीम हाती घेतली आहे.

चार महिन्यांपूर्वी नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह जवळपास हजारो शेतकऱ्यांना मोठया नुकसानीचा सामना करावा लागला होता. यातच राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या या नुकसानीची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई अनुदान दिले जाईल अशी घोषणा केली होती. मात्र आज चार महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने शेतकऱ्यांनी आमदारांना फोन करावे अस आवाहन केल आहे.

 

यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळ यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, कालपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील आमदारांना फोन करावेत आणि तात्काळ सरसकट सर्व अर्ज जमा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कांदा अनुदान आणि अतिवृष्टीचे पंचनामे झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यास सांगून, संबंधित आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये ही मागणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी फोनवरून आमदारांकडे करावी असा आवाहन दिघोळे यांनी केल आहे.

 

जोपर्यंत याबाबत अधिवेशनामध्ये ठोस भूमिका घेतली जाणार नाही तोपर्यंत प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांचे आमदारांना इतक्या संख्येने फोन केले पाहिजे की, आमदारांचे वैयक्तिक मोबाईल नंबर व त्यांच्या पीए चे मोबाईल नंबर दर मिनिटाला खणखणले पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेण्याच आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघे यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here