
देवळा : बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरुवात केलेली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय समता परिषदेचे तालुका अध्यक्ष .रमेश अहिरे यांनी तहसीलदार.विजय सूर्यवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा कि ,ओबीसींची नुकतीच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. तमिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांना राज्याच्या विकासासाठी त्याचा उपयोग झाला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासूनची प्रलंबित आहे. यामुळे मागासवर्गीय ओबीसी शासनाच्या सोयी सवलतींपासून वंचित राहिला आहे. याची शासनाने दखल घ्यावी ,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष रमेश अहिरे, आबा खैरनार , दिलीप बागुल , माजी तालुकाध्यक्ष वसंत शेवाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक देशमुख , प्रभाकर अहिरे ,कोळी महासंघाचे देवळा तालुका अध्यक्ष .योगेश पवार आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम