
देवळा : योगसाधनेतुन एकाग्रता वाढीस लागते. सुखी , निरामय आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधना व संतुलित आहार यांचा समन्वय असणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन डॉ.विद्या सोनवणे यांनी आज येथे केले.

देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात ” निर्भय कन्या अभियान ” राबविण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ विद्या सोनवणे उपस्थित होत्या . यावेळी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
कार्यशाळेत कराटे प्रशिक्षक निलेश गुप्ता यांनी ” कराटे ” मुलींसाठी आवश्यक या विषयवार बोलतांना सांगितले की ,आजच्या युगात निर्भय , निरामय आयुष्य जगण्यासाठी आत्मविश्वास व धैर्य हे गुण महत्वाचे आहेत. त्यासाठी प्रत्येक मुलीला स्वसंरक्षण करता आले पाहिजे .त्यासाठी सर्वांनी तयार रहा असे आव्हान केले.
दुसऱ्या सत्रात श्री गुप्ता यांनी मुलींना बेसिक कराटेचे प्रशिक्षण देऊन मुलींकडून त्याचे प्रात्यक्षिकही करुन घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर हे होते. कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. जयमाला चंद्रात्रे यांनी प्रस्ताविकेतुन कार्यशाळेची भूमिका मांडली. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ . सतीश ठाकरे यांनी प्रमुख अतीथींचा परिचय करुन दिला.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजयकुमार जोशी , प्रा. हेमलता निकम , प्रा.शिवम् वाघ , प्रा. अतुल पवार , सुनील आहेर , मनीषा आहेर उपस्थित होते. हेमांगी बच्छाव व निलीमा जाधव यांनी सूत्रसंचलन केले. पूजा नवले हिने सर्वांचे आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम