पालक मंत्री म्हणून भुसे निष्क्रिय ठरत आहे – निखिल पवार

0
42

मालेगाव : येथील तहसीलदार पदावर पूर्णवेळ तहसीलदार नेमावा या मागणीसाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. मालेगाव तहसीलदार पदावर नियुक्त चंद्रजित राजपूत गेल्या चार महिन्या पासून कौटुंबिक व वैद्यकीय कारणास्तव रजेवर गेले आहेत.

त्यांच्या जागेवर प्रभारी तहसीलदार पदावर प्रथमतः दिपक पाटील, नंतर प्रशांत पाटील व आता कैलास पवार यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडून करण्यात आली आहे. परंतु प्रभारी तहसीलदार यांच्याकडे नाशिक येथील पदभार असल्याने ते मालेगाव तहसीलदार तथा कार्यकारी दंडधिकारी पदाला न्याय देऊ शकत नाही.

मालेगावचे तहसीलदार रजेवर असल्याने व प्रभारी तहसीलदार पूर्ण वेळ उपलब्ध नसल्याने जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जमीन महसूल संदर्भित अर्धन्यायिक प्रकरणे, रस्ते वहिवाट प्रकरणे प्रलंबित आहेत. जातीचे, उत्पन्नाचे, व इतर दाखले वेळेवर उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी व रुग्णांचे हाल होत आहेत. कार्यालयात शिस्त जाणवत नाही. अवैध गौण खनिज उत्खनन वाढले आहे. अन्न धान्य पुरवठा व वितरन याबाबत अडचणी सोडविणे आवश्यक आहे. मालेगाव हे अतिसंवेदशील शहर आहे याठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक विविध बाबी तहसीलदार पदाशी निगडित असतात तसेच शहरात व तालुक्यात नियमित धार्मिक व राजकीय कार्यक्रम पार पडत असतात त्यांच्या परवानग्या वैगरे त्यामुळे मालेगाव तहसीलदार पदावर पूर्णवेळ अधिकारी नियुक्त असणे अत्यंत आवश्यक असते.

चंद्राजित राजपूत हे दीर्घकाळ रजेवर आहेत यामागे काही राजकीय दबाव असल्याची चर्चा सुरू आहे. राजपूत यांना सक्तीने तत्काळ मालेगाव तहसीलदार पदावर रुजू व्हायचे आदेश देणे आवश्यक असून ते रुजू होण्यास इच्छुक नसल्यास तत्काळ पूर्णवेळ नवीन तहसीलदारांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यापूर्वी आदरणीय अपर जिल्ह्याधिकारी यांना दिनांक २३/१२/२०२२ रोजी दिले होते परंतु आज रोजी पर्यंत त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे आज रोजी आम्ही अपर जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करीत असून, तत्काळ पूर्णवेळ नवीन तहसीलदारांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हा सर्वात मोठा तालुका असून देखील गेल्या साडेतीन चार महिन्यांपासून तहसीलदार पदावर पूर्णवेळ अधिकारी नियुक्त नाही, गट विकास अधिकारी देखील गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ नियुक्त नाही , जनतेचे प्रचंड हाल व गैरसोय होत असून हे पालकमंत्र्यांचे अपयश आहे. पालकमंत्री महोदय यांनी मनपा आयुक्त, अपर पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता व इतर अधिकारी मर्जीतील नेमणूक करून घेतले त्या प्रमाणे आपल्या मर्जीतील हवा तो अधिकारी नियुक्त करावा पण जनतेला वाऱ्यावर सोडून प्रशासकीय सुधारणा न करता मालेगावचे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवले जाऊ शकत नाही असे मत निखिल पवार यांनी व्यक्त केले

पाकीट दिल्याशिवाय कुठले अधिकारी येत नाही असे मत शेखर पगार यांनी व्यक्त केले. मालेगाव शहराला कोणी वाली नसून सदर आंदोलनाला सर्व सामाजिक संघटनांचा पाठिंबा असल्याचे रामदास बोरसे यांनी म्हटले.
यावेळी निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, प्रा.के. एन. अहिरे, अनिल निकम, रविराज सोनार, शेखर पगार, शेखर पवार, भरत पाटील, कैलास शर्मा, संजय बोरसे, रामदास बोरसे, स्वप्निल भदाणे, गोविंद पवार, कैलास तिसगे, साहेबराव वाघ, प्रवीण चौधरी, गोपाल सोनवणे, मनोज पाटील, समीर जोशी, गणी शहा, आनंद सिंग ठोके, कमलेश पगार, तात्यासाहेब ठोके, सुनील शेलार, कुणाल सूर्यवंशी, दीपक पाटील, नाना सूर्यवंशी, सतीश गुंजाळ, विकास निकम, करण भोसले आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here