नवी दिल्ली – केंद्रात मोदी सरकार आल्यापासून मोठमोठ्या कंपन्याचा खासगीकरण करण्याचा घाट सुरु असून त्यात केंद्र सरकार आता रेल्वेच्या एका महत्वाच्या कंपनीचे खासगीकरण करण्याचा तयारीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ह्या खासगीकरणाला हिरवा कंदील दाखवला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यामुळे रेल्वेच्या या कंपनीच्या विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, रेल्वेच्या जमिनी परवाना शुल्क ६ टक्क्यांवरून १.५ टक्क्यांवर आणण्याचा, तसेच भाडेपट्ट्याचा कालावधीही पाच वर्षांवरून ३५ वर्षे करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेण्यात आला आहे. यामुळे रेल्वेची अतिमहत्वाची कंपनी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या विक्रीचा मार्ग खुला झाला आहे. या निर्णयामुळे या कंपनीतील सरकारी हिस्सेदारी विक्रीच्या प्रक्रियेत वेग येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ह्यात मंत्रिमंडळाने पंतप्रधान गति शक्ती योजना लागू करण्यासाठी रेल्वेची जमीन दीर्घकालीन भाडेपट्ट्याने देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तसेच पुढील पाच वर्षांत ३०० पीएम गति शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जाणार आहेत.
कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CONCOR) ही रेल्वेची कंपनी आहे ती विविध मार्गांनी मालवाहू कंटेनरची वाहतूक करते. या मालवाहतुकीतून रेल्वेला खरे उत्पन्न मिळते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम