Nashik : 8 जुलैला होणाऱ्या “शासन आपल्या दारी” उपक्रमासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे पालकमंत्र्यांनी दिले आदेश..

0
49

Nashik : शासन आपल्या दारी हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये सध्या राबविण्यात येतो आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्य शासनाच्या या उपक्रमाच्या अनुषंगाने आठ जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हा पातळीवर शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना राज्याचे बंदरे व खणी कर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. शासन आपल्या दारी हा उपक्रम जिल्हा पातळीवर राबविला जाणार असून या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास 72 कार्यक्रमांच आयोजन तालुका पातळीवर करण्यात आलं असून कार्यक्रमांच्या माध्यमातून साधारणतः दोन लाख पन्नास हजार 569 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे. जिल्हा पातळीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये होऊ घातलेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी अधिनस्त कार्यालयांकडून योजनानिहाय लाभार्थी यांची यादी सादर करावी आणि या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळी घेऊन येण्यासाठी वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, जेवण अशा प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्या संबंधित नियोजित करावे असं पालकमंत्री भुसे यांनी बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

 

सदर बैठकीमध्ये कामगार विभाग, पशुसंवर्धन, कृषी, समाज कल्याण, आरोग्य, विद्युत, महिला व बालकल्याण, महसूल व कौशल्य विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला तसेच जिल्हा प्रशासनाने अनुकंपा भरतीच्या अनुषंगाने केलेल्या कामांचं पालकमंत्री यांनी यावेळी कौतुक देखील केलं. याचबरोबर ज्या विभागाच्या अनुकंपा भरती संदर्भात प्रलंबित प्रकरणांवर लवकरात लवकर योग्य कारवाई करून नियुक्ती आदेश तयार करावे असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. या कार्यक्रमा वेळी रोजगार मिळावे, महाआरोग्य शिबिर, कृषी योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावावे तसेच कार्यक्रमाच्या वेळी लाभार्थ्यांना जेवणाची व्यवस्था ही महिला बचत गटातर्फे करण्यात यावी असे देखील सांगितल आहे.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल आहेर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, दिलीप बनकर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त भाग्यश्री बानाईत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल तसेच सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here