मुंबई: एका बाजूला बेरोजगारी असताना दुसऱ्या बाजूला शिंदे सरकारने मोठा दिलासा आहे. तरुणाईसाठी मोठा दिलासा मिळाला असून सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व नगर परिषदा, महानगरपालिका आणि नगर पंचायतींमध्ये 40 हजार पदांची भरती करण्याचे आदेश दिले असून मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आणि अ वर्ग महापालिकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.
काय आहे मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विट?
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा आणि पंचायतींमध्ये ५५ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. संचालनालयामार्फत राज्य संवर्गातील एकूण 1983 पदांची भरती करण्यात येणार असून नगर पंचायत स्तरावरील संवर्गातील गट क आणि गट ड मध्ये 3720 पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया 34 जिल्ह्यांतील जिल्हा दंडाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती करत आहे.
मुंबई महानगरपालिकेत 8490 पदांवर भरती
मुंबई महापालिकेतील आठ हजार ४९० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून मे अखेरपर्यंत संपूर्ण भरती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करून युद्धपातळीवर प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी असणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम