’50 खोके एकदम ओक्के’; धनंजय मुंडेंनी वाभाडेच काढले

0
36

मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस मात्र विरोधकांनी एकत्रित येत आज अक्षरशः सत्ताधाऱ्यांना खाली माना घालायला लावल्या, विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक चांगलेच भडकले. राज्यात प्रचंड पाऊस सुरू असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी जोरदारपणे केली. तसंच यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या.

’50 खोके एकदम ओक्के’, शिंदे गटातील आमदारांना चिडवलअधिवेशन सुरू होण्याच्या सुरवातीला महाविकास आघाडीतील नेत्यांनी आक्रमक होत शिंदे गटातील आमदारांना अती डिवचलं. सभागृहात जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदार जवळ येताच ’50 खोके, एकदम ओक्के’, ‘आले रे आले गद्दार आले’, अशा घोषणांनी परिसर विरोधकांनी दणाणून सोडला.

‘आशिष शेलार यांना पुन्हा मुंबई अध्यक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,’ मुंडेंच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतलं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या घोषणांनी आज लक्ष वेधून घेतलं. त्यांनी दिलेल्या घोषणा आज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ईडी सरकार हाय हाय, शेतकऱ्यांना मदत न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, संजय शिरसाट यांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, सुधीरभाऊंना चांगलं खातं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ओला दुष्काळ जाहीर न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आशिष शेलार यांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. आशिष शेलार यांना पुन्हा मुंबई अध्यक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अशा एकणा अनेक घोषणा देत मिश्किल वातावरण निर्माण केले.

आज सकाळी सभागृहाबाहेरच सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आलेत व एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागले. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आणि त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर देत ठाकरेंना टार्गेट केले. “या परिस्थिती शेतकरी, महिला यांच्या आवाजाचा कोणीच विचार करत नाही. स्वतःचा फायदा बघत असल्याचे चित्र आहे, सरकारमध्ये अपक्षांना स्थान नाही, महिलांना स्थान नाही आणि मुंबईकरांना देखील स्थान नाही. आम्ही लोकशाहीचा खून करणाऱ्यांच्याविरोधात उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणारच,” अशी जळजळीत टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांच्या टीकेला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं. “आदित्य ठाकरेंची भाषा अशोभनीय आहे. बेईमानी आणि लाचारी या शब्दांचा अर्थ समजायचा असेल तर मतं घ्यायची मोदीजींचा फोटो दाखवून आणि सोनिया गांधी यांच्या मांडीवर जाऊन बसायचे, हे बेईमानी नाही का? लाचार या शब्दाचा अर्थ घ्यायचा असेल तर मदत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यायची आणि सत्तेची गोड फळं चाखण्यासाठी शरद पवारांच्या गोदीत बसायचं, याचा लाचारी म्हणत नाही का? आदित्यजी जरा अभ्यास करा, अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे वय आहे आणि मगच भाष्य करा,” असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here