महाराष्ट्रातील एव्हरेस्ट सजले वारली चित्रकलेने

0
64

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : सह्याद्री म्हंटल की अग्नी आणि पृथ्वीच्या मिलनातून जन्माला आलेला मूर्तिमंत पौरुषाचा आविष्कार,सुमारे पंधरा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या उदरातून रसरसत्या ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झाला. सुमारे नऊ कोटी वर्ष तो धगधगता राहिला त्याच्या प्रत्येक कणाकणात त्याने प्रचंड ऊर्जा साठवली मग साडे सहा कोटी वर्षांपूर्वी हा ज्वालामुखीचा लावा विसावला आणि त्याच्या विरामाची जागा ठरली ही दख्खनची भूमी. त्याचे बाह्यांग राकट कणखर आणि बलाढ्य बनले तर अंतरंग बनले मृदू कोमल आणि संपन्न ,आपल्या अंगाखांद्यावर आकाशाला गवसणी घालणारे उंच उंच सुळके हा डौलाने मिरवत आहे.

निसर्ग चक्र चालविणारे याचे पर्वत असंख्य शिखरावरून या नद्या धारणीच्या ओढीने समर्पित होतात. या नद्यांनी खोरी वसवली मानव जातीला आमंत्रण दिले त्यांची प्रगती पाहिली व त्यांच्या संरक्षणासाठी असंख्य बलाढ्य दुर्ग पेलून धरले आपल्या अंतर्यामात आसरा दिला शिल्पकलेला आणि मूर्तिमंत पौरुषाच्या हृदयी वसविले चिरंजीवी सौंदर्य.अश्या या मराठी महाराष्ट्र देशीच्या संयुगिरीच्या कळसाचा मान मिळाला आहे तो एका उत्तुंग शिखराला दुर्गांचा देश म्हणून जगभरात प्रसिद्ध ओळख असलेल्या महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्ट ज्याला म्हणू ते सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई

नगर -नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर सहयाद्रीच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या कळसुबाई शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे १६४६ मिटर म्हणजेच पाच हजार चारशे फूट आभाळी कळसुबाई शिखराची उंची आहे.दरवर्षी नवरात्र उत्सवात या शिखरावरील मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. सफर महाराष्ट्राच्या कळसाची,दर्शन कळसावर वास्तव्य करणाऱ्या आदिवासीं बांधवांच्या देवतेचे ,भेट डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या मावळ्यांची आणि भेट महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखराची आणि चढाई कळसुबाईची म्हंटल्यावर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना ओढ लागते ती नवरात्र उत्सवाची. याच यंदाच्या नवरात्र उत्सवासाठी कळसुबाई शिखरावरील देवी कळसुबाईचे मंदिर सजले आहे ते वारली चित्रकलेने. दरवर्षीप्रमाणे बारी जहांगीरदारवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ प्रत्येक वर्षी नवरात्र उत्सवासाठी येथील मंदिराची पूर्व रंगरंगोटी करत असतात. प्रत्येक वर्षी या मंदिरावर रंगरंगोटी करत नामशेष होत चाललेली आदिवासींची वारली चित्रकला साकारली जाते.अशीच वारली चित्रकला यंदा कळसुबाई शिखरावरील मंदिरावर साकारली आहे ती पालघर येथील सफाळे , केलवा मैत्री ग्रुप ने आणि यांना चित्रीकरणात मदत केली आहे ती रमेश साबळे यांनी.

कळसुबाई शिखर भाविकांना चढाई करण्यासाठी देवदर्शनासाठी रंगरंगोटी सह सज्ज झाले आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने माची मंदिर परिसर ते शिखरावरील चढाईसाठी संरक्षण म्हणून असलेल्या शिड्या ग्रीलिंग ते शिखरावरील मंदिर परिसर संरक्षण ग्रीलिंग दुरुस्ती करून रंगरंगोटी सह तयार आहे.

ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासींची चित्रकला ही त्यांच्या आयुष्यच एक अविभाज्य अंग आहे. ही कला ठाणे पालघर, रायगड या तीन जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते. येथील भोळ्या भाबड्या खडतर प्रवास करणाऱ्या आदिवासींना वारली कला एक अनोखी आनंद देणारी भेट आहे. वारली चित्रकलेचा स्रोत परिपोष वारली संस्कृती आणि परंपरा व त्यांच्या सभोवतालच्या परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे.त्यामुळे वारली चित्रकलेत धार्मिक विधी,लग्नविधी, देवदेवता, दैनंदिन जीवन,लोकजीवन व त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर,परिसरातील पशु पक्षी, वृक्षवेली, नदिनाले,डोंगर पहाड, वने, नाच नृत्य, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार परिसर इ विषयाला धरून भिंती चित्र रेखाटलेली दिसतात यंदाच्या नवरात्र उत्सवात कळसुबाई शिखरावरील मंदिरावर साकारलेली वारली चित्रकला सर्व भावी भक्तांचे आकर्षण ठरणार यात शंका नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here