द पॉईंट नाऊ: रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेकडून पॉलिसी व्याजदरात ५० आधार अंकांची वाढ करण्यात आली आहे. रेपो दर ५. ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो दरवाढीमुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होणार आहेत. रेपो दरात वाढ करण्या संदर्भातील निर्णय सेंट्रल बँकेतील चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीमध्ये घेण्यात आला. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. रेपो दरात मे महिन्यापासून १.९० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
महागाई नियंत्रणात ठेवण्याकरिता देशभरातील केंद्रीय बँकांकडून व्याजदर वाढविण्यात आले आहेत. आरवीआयने मे महिन्यात रेपो दरात १९० बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. यूएस फेड रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याजदरात ७५ वेसिस पॉइंट्सने वाढ केली होती, त्यानंतर रुपयावर दबाव वाढला होता. तसेच किरकोळ महागाईत ऑगस्टमध्ये पुन्हा वाढ झाली होती. एकंदर परिस्थिती पाहता आरबीआय शुक्रवारी रेपो दरात वाढ करण्याची घोषणा करणार असल्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली होती.
रेपो दरात वाढ केल्यास कर्ज घेण्याच्या खचात वाढ होईल. कारण रेपो दरामध्ये वाढ झाल्याने बँकांच्या कर्ज खर्चात वाढ होईल. बँक ते ग्राहकांना देतील आणि परिणामी कर्ज घेणे महाग होणार आहे. याचा परिणाम घरांच्या विक्रीवरही होणार आहे. रॉ मटेरियल म्हणजेच कच्च्या मला किमतीतही वाढ झाल्याने बांधकाम व्यावसायिकांनी स्थावर मालमत्तेच्या किमती आधीच वाढवल्या आहेत. यामुळे आत्ताच ट्रॅकवर परत आलेल्या रिअल इस्टेट बाजाराच्या पुनर्प्राप्तीवरही परिणाम होईल.
इतर कर्जही महाग
गृहकर्जा बरोबरच वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जेही महाग होतील. बोरोइंग खर्चात वाढ झाल्याने, सामान्य जनता अनावश्यक खर्च टाळणे पसंत करतात, ज्यामुळे मागणीतही घट होते. मात्र, रेपो रेट वाढल्याने एफडी असलेल्या ग्राहकांना फायदा होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम