सटाणा: प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा व शरद राव पवार ज्युनियर कॉलेज कपालेश्वर तालुका बागलाण येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तथा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिक बापू कृष्णा काकुळते यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी कपालेश्वर गावातून काढण्यात आली यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता हर घर तिरंगा मोहिमेने संपूर्ण गाव व परिसर तिरंगामय झाला होता. कपालेश्वर ग्रामपंचायतीचे ध्वजवंदन येथील ज्येष्ठ नागरिक जयराम गांगुर्डे यांचे हस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजवंदन श्री बिबीचंद जगताप यांचे हस्ते तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ध्वजवंदन पोपट ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत उत्सव निमित्त आश्रम शाळेत 75 फुटांची रांगोळी काढण्यात आलेली होती ही रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली होती. यापूर्वी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या व त्यातील यशवंतांना मान्यवरांच्या हस्ते प्रशिस्ती पत्र देण्यात येऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी कपालेश्वर चे सरपंच मनोहर ठाकरे स्कूल कमिटीचे अध्यक्ष उत्तम बागुल, गोविंदा ठाकरे, माजी सैनिक बापूसाहेब काकुळते, डॉक्टर सुरेश सोनजे ,डॉक्टर धनगे पाटील, मुख्याध्यापक जगदीश सोनवणे आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ध्वजवंदन नंतर रांगोळी प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले.
यावेळी संपदा सोनवणे,रसिका पगार, दिव्यांका शेवाळे, आरती अहिरे,सृष्टी पाटील, राखी गायकवाड, रिया ठाकरे, गायत्री चौरे, गायत्री गायकवाड, यांनी देशभक्तीपर रेखाटलेल्या रांगोळ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली त्यानंतर समूह गायन, देशभक्तीपर समूह नृत्य, सादर करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य गोरख निकम यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज शेवाळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जगदीश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र शेवाळे, अतुल पवार, कोंडाजी सूर्यवंशी, कृष्णा अहिरे, श्रीमती शोभा शिरसाट, सौ उषा सोनवणे, सौ शोभा सूर्यवंशी, प्राध्यापक निंबा बागुल, प्राध्यापक युवराज शेवाळे,प्राध्यापक सुनील खैरनार, प्राध्यापक गोकुळ पाटोळे, प्राध्यापक काकाजी खैरनार,देविदास शिरसाठ,सुनील पवार, गंगुबाई पवार, शरद सूर्यवंशी, शिवाजी बिरारी, प्रभाकर राजभोज, शांताराम पिंपळे, रेवा राम चक्रपाणी, ऋषिकेश शिरसाट, शुभम पवार यांनी विशेष परिश्रम घेतले तर कुमारी संपदा सोनवणे हिने उपस्थितांचे आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम