महाराष्ट्रातील एव्हरेस्टवर दसऱ्याच्या दिवशी भाविकांची गर्दी

0
30

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : कोरोनाच्या संचारबंदीनंतर यंदा महाराष्ट्र राज्यातील लाखो पर्यटक, भाविक भक्तांनी महाराष्ट्रातील एव्हरेस्ट असलेल्या कळसुबाई शिखरावर चढाई करत देवदर्शनासह निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला. यंदा नवरात्र उत्सवात तब्बल दहा दिवस कळसुबाई शिखरावर भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी देखील हजारोंच्या संख्येने कळसुबाई शिखरावर भाविक भक्तांची गर्दी पहिल्यांदा उसळली होती. महाराष्ट्र राज्याभरात परिचित असलेल्या कळसुबाई मित्र मंडळाकडून शिखरावरील मंदिरात नवरात्रात घट कलशाची स्थापणा होते.

नवरात्र उत्सवात रोज सकाळी शिखर सर करून सकाळी कळसुबाई मित्र मंडळ घोटी यांच्यासह बारी येथील कळसुबाई स्थानिक समिती। यांच्याकडून नित्यनेमाने देवीची आरती घेतली जाते.यंदा कळसुबाई मित्र मंडळाला सव्वीस वर्ष पूर्ण झाली. यंदाच्या नवरात्र उत्सवात कळसुबाई समिती सह स्थानिक वन विभागाच्या वतीने भाविकांनी गड परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. स्थानिक महीला बचत गटांनी देखील सहभागी होत दहा दिवस कळसुबाई शिखर परिसराची स्वछता मोहीम फत्तेशिखस्त केली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बारी येथील कळसुबाई समितीच्या वतीने व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या संरक्षणासाठी कळसुबाई शिखरावरील सर्व जीर्ण झालेल्या मोडकळीस आलेल्या शिड्या दुरुस्त करून काही ठिकाणी नवीन शिड्या देखील बसविण्यात आल्या आहेत.

शासनाने लक्ष देत पर्यटन विकास निधीतून महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखराचा विकास व्हावा तसेच याठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना विविध सुख सुविधा उपलब्ध करून मिळाव्यात जे ने करून याचा थेट परिणाम येथील आदिवासींच्या रोजगारावर पण होईल अशी मागणी स्थानिक कळसुबाई विकास समिती, महिला बचत गट,भाविक भक्तांनी केली आहे. यंदा नवरात्र उत्सवात दहा दिवस कळसुबाई माची मंदिर ते कळसुबाई शिखरावरील मंदिर परिसरात स्वच्छता बघायला मिळाली.कळसुबाई शिखर सर करणाऱ्या पर्यटकांनी भावीक भक्तांनी गडावरील कड्या कपाऱ्यातील शांत थंडगार शुद्ध पाण्याने थकवा घालवत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व रानफुलांनी सजलेल्या ऊन सावली ढगांच्या आणि धुक्यांच्या कळसुबाई शिखरावरील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला.

अनेक भाविक भक्तांनी कळसुबाईचा आनंद आपल्या मोबाईल फोन मध्ये कैद केला. कळसुबाई शिखरावरील जुनी पाण्याची विहीर भाविकांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे. बाराही महिने या विहिरीला पाणी असतं याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना मुक्या प्राण्यांना एकमेव पिण्याच्या पाण्याचा उदभव म्हणजे ही विहीर आहे. दसऱ्याच्या दिवशी राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखराची चढाई करत भाविकांनी विजयादशमी उत्साहात साजरी केली.नवरात्र उत्सवात येणाऱ्या पर्यटक भाविक भक्तांवर येथील स्थानिक आदिवासी बांधवांचा रोजगार अवलंबून असतो कोरोनाच्या काळानंतर यंदा येथील आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध झाला.

कळसुबाई माची मंदिर ते कळसुबाई शिखरापर्यंत यंदा नारळ प्रसाद, लिंबू सरबत, छोटे छोटे हॉटेल, खेळणी पाळणी दुकाने विविध कटलरी स्टॉल रानभाज्या रानमेवा, फोटोची दुकाने बघायला मिळाली. अश्या आनंददायी वातावरणात उत्साहात यंदाचा नवरात्र उत्सव साजरा झाला. आणि लाखो भाविक भक्तांनी नवरात्र उत्साहाचा आनंद द्विगुणित केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here