भुसे यांच्या संपत्तीची ED मार्फत चौकशी करा – निखिल पवार

0
33

मालेगाव : शेतकरी आंदोलन जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा राजकीय नेते मात्र कानाडोळा करत असतात. शेतकऱ्यांना कोणी गांभिर्याने घेताना दिसत नाही. मालेगाव तालुका व शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळा दिवस ठरला गेल्या ७० वर्षाच्या काळात न्याय मागण्यांसाठी २८ दिवस आंदोलन करण्याची वेळ पहिल्यांदा बोरी अंबेदरी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर आली असून येथील शेतकरी गणेश कचवे याने विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पालकमंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी भाजप नेते डॉ. अद्वय हिरे यांनी केली.

बोरी अंबेदरी प्रकल्पग्रस्त शेतकरी गणेश कचवे यांनी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकारी व सामाजिक संघटनेच्या वतीने मोसमपूल भागातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलक आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलन इतके तापले असताना कानाडोळा करण्यात आला शेतकऱ्यांच्या आंदोलनात कोणताही राजकिय पक्ष सहभागी नव्हता. शेतकरी आंदोलन हे चिघळत असून आता राजकीय सहभाग देखील वाढला आहे. २८ दिवसानंतर ही आंदोलकांची मागणी मान्य होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असून आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी ठामपणे उभे असल्याची ग्वाही काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी दिली आहे

या आंदोलनाकडे लक्ष देवून पालकमंत्र्यांनी सर्वस्वी जबाबदारी स्वीकारत प्रकल्प रद्द करावा अन्यथा राजीनामा द्यावा, शेतकऱ्यांची मागणी रास्त असून महाराष्ट नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, अशी ग्वाही मनसे शहराध्यक्ष राकेश भामरे यांनी दिली.

आम्ही मालेगावकर संघटनेचे निखील पवार यांनीही पालकमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केली. मालेगाव धुळे लोकसभा मतदार संघाचे खा डॉ सुभाष भामरे यांनी गेल्या ३० दिवसांपासून बोरी आंबेदरी पाईप लाईन कालवा प्रकल्प विरुद्ध आंदोलन सुरू असताना आजुन पर्यंत दखल घेऊन त्यांची विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही. त्यांना शेतकऱ्यांचे आंदोलनाचे गांभीर्य लक्षात येत नाही, खा. भामरे त्यांनी भूमिका तत्काळ स्पष्ट करावी तसेच पालकमंत्री महोदय यांच्या संपत्तीत २००४ ते आज मध्ये प्रचंड वाढ झाली असून त्याची ED मार्फत चौकशी करण्याची गरज आहे अशी आग्रही मागणी निखिल पवार यांनी केली आहे.

यावेळी गुलाब पगारे, मनसेचे शहराध्यक्ष राकेश भामरे, भारत म्हसदे, जितेंद्र देसले यांनी मनोगत व्यक्त केले.. यावेळी सुशांत कुलकर्णी, देवा पाटील, जितू दिसले, भरत पाटील, मदन गायकवाड, रामदास चोरसे, अरुण माऊली पाटील, विठोबा छरंग, जगदीश गोरे, तुषार पाटील, संजय काळे, गजू देवरे, दिनेश साबणे, नंदू सावंत, कैलास कोठावदे, संजय निकम, दीपक गायकवाड सोमन्ना गवळी, भरत बागुल, महेश वाघ, साहेबराव वाघ, अशोक आखाडे, मुन्ना आहिरे, मोहन कांबळे, श्याम गांगुर्डे, स्वप्नील भदाणे, अनिल पाटील, कुणाल निकम, मुन्ना बच्छाव, रामदास बच्छाव, जितेंद हिरे, कैलास बच्छाव, शरद शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, निवृत्ती जाधव, रतन जाधव, निवृत्ती अहिरे, समाधान कचये, भूषण कचवे, रितू वाघ, नंदलाल कचवे, राकेश कचवे, अमोल कचदे आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here