मुंबई : आधी दीपक चाहर व अर्शदीप सिंगची भेदक गोलंदाजी व नंतर सलामीवीर केएल राहुल व सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आज झालेल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी भारताने घेतली आहे.
#TeamIndia finish things off in style! 👌 👌
A SIX from vice-captain @klrahul to bring up his FIFTY as India take a 1-0 lead in the 3-match #INDvSA T20I series. 👏 👏 @mastercardindia | @StarSportsIndia pic.twitter.com/6Fh0APf52F
— BCCI (@BCCI) September 28, 2022
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व तो भारताच्या गोलंदाजांनी खरा ठरवला. अवघ्या तीन षटकात ९ धावांवर द. आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतला. मात्र, त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला केशव महाराज, वेन पार्नेल आणि एडेन मार्केमने आपल्या खेळीने संघाचा डाव सावरत २० षटकात ८ गडी गमावून १०६ धावा केल्या. भारताच्या अर्शदीपने ३, तर चाहर व हर्षल पटेल प्रत्येकी २-२ बळी घेतल्या.
यावेळी १०७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय संघ उतरला. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर सुर्यकुमार व केएल राहुलने आपली भिस्त सांभाळली व दोघांनी नाबाद ५० व ५१ अशी अर्धशतकी खेळी करत संघाला १६.४ षटकात विजयी लक्ष्य गाठले. गोलंदाज अर्शदीपला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम