भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखत सहज विजय; गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी

0
32

मुंबई : आधी दीपक चाहर व अर्शदीप सिंगची भेदक गोलंदाजी व नंतर सलामीवीर केएल राहुल व सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आज झालेल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी भारताने घेतली आहे.

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व तो भारताच्या गोलंदाजांनी खरा ठरवला. अवघ्या तीन षटकात ९ धावांवर द. आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतला. मात्र, त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला केशव महाराज, वेन पार्नेल आणि एडेन मार्केमने आपल्या खेळीने संघाचा डाव सावरत २० षटकात ८ गडी गमावून १०६ धावा केल्या. भारताच्या अर्शदीपने ३, तर चाहर व हर्षल पटेल प्रत्येकी २-२ बळी घेतल्या.

यावेळी १०७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय संघ उतरला. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर सुर्यकुमार व केएल राहुलने आपली भिस्त सांभाळली व दोघांनी नाबाद ५० व ५१ अशी अर्धशतकी खेळी करत संघाला १६.४ षटकात विजयी लक्ष्य गाठले. गोलंदाज अर्शदीपला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here