भारत इंग्लंड दुसरा टी२० सामना : कोणाचा पत्ता कट होणार ?

0
29
cricket

मुंबई – आज संध्याकाळी एगबस्टन येथे सुरू होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात स्टार खेळाडूंच्या वापसीमुळे अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

स्टार खेळाडू विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा यांच्या वापसीमुळे अन्य खेळाडू ईशान किशन, दीपक हुडा, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंह व अन्य खेळाडूंना बेंचवर बसण्याची वेळ येणार आहे. पहिल्या सामन्यात दीपक हुडा व अर्शदीप यांनी चांगली खेळी करत भारताला विजय सलामी मिळवून दिली.

दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत(उपकर्णधार), दिनेश कार्तिक, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here