ढगाळ वातावरणात, तापमानाचा पारा ४३ अंशावर

0
34

मार्चच्या मध्यापासून उन्हाचा तडाखा जाणवत आहे. तर आता सलग तीन दिवस ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसापूर्वी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात २ ते ३ अंशांची घसरला झाली. आज राज्यात शनिवारी सकाळी ११ वाजेपासूनच तापमानाचा पारा ३९ अंशावर होता. त्यामुळे साकळपासूनच उन्हाचे चटका बसत असून बाहेर पडण्यासाठी विचार करावा लागतो.

हवामान विभागाकडून राज्यभरात २१ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. आज तापमानाचा पारा ४३ अंशावर जाण्याची शक्यता आहे. दिवसभर उकाडा जाणवत असून तापमान ४३ अंशांवरून ४० अंशापर्यंत खाली आलेले हाेते. यामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.

त्यामुळे २३ एप्रिल राेजी जिल्ह्यात सकाळपासून वातावरण ढगाळ हाेते. एकीकडे वाढते तापमान आणि दुसरीकडे ढगाळ वातावरण यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. दुपारच्या वेळी अनेक जण घराबाहेर पडणे टाळत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रोज ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हापासून थोडा दिलासा मिळत असला तरी उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here