महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सोमवारी सुप्रीम कोर्टात झाली. यादरम्यान वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितले की, उद्या विधानसभेत अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे, जर कोर्टाने आज सुनावणी केली नाही तर उद्या स्पीकर फेटाळून लावतील. जोपर्यंत न्यायालय ऐकत नाही, तोपर्यंत त्यांना निर्णय घेण्यापासून रोखावे. यावर भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही.रामन म्हणाले की, त्यांनी अजून निर्णय घेऊ नये, असे सभापतींना कळवावे. मात्र, ही वेळखाऊ बाब असल्याचे त्यांनी सांगितले. खंडपीठ तातडीने स्थापन करता येणार नाही.
महाराष्ट्रातील शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. उद्धव गटाचे सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणीची मागणी केली. त्याचवेळी विधानसभा सचिवालयाच्या प्रधान सचिवांनी सुप्रीम कोर्टात उत्तर देत राहुल नार्वेकर हे स्पीकर झाले असून त्यांना अपात्रतेच्या खटल्याची सुनावणी करण्याची परवानगी दिली जाईल, असे सांगितले होते.
दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या 15 आमदारांना भावनिक पत्र लिहिले आहे. संकटकाळातही पक्षावर असलेली निष्ठा आणि विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी या पत्राद्वारे आमदारांचे आभार मानले आहेत. पत्रात उद्धव यांनी लिहिले आहे की, “कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनाच्या फंदात न पडता तुम्ही सर्वांनी एकजूट राहून शिवसेनेला बळ दिले, त्याबद्दल तुमचे आभार. माता जगदंबा तुम्हाला सदैव निरोगी ठेवो, अशी प्रार्थना करतो.”
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम