आता सरकारी योजनांच्या लाभासाठी ‘आधार’च आवश्यक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

0
35

नवी दिल्ली – देशातील सर्वात महत्वाचे आणि उपयोगात येणाऱ्या कागदपत्रांपैकी एक म्हणजे आधार कार्ड. आता UIDAI ने सर्व केंद्रीय मंत्रालये आणि राज्य सरकारांना ११ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक पाठवले आहे. त्यानुसार ज्यांच्याकडे जर आधार कार्ड किंवा आधार कार्ड नोंदणीची पावती नसेल अशांना कुठल्याही सर्व सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही.

UIDAI ने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार, आता सबसिडीचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळणार आहे, ज्यांच्याकडे आधार कार्ड किंवा आधारसाठी अर्ज केल्याची पावती असेल. विविध सबसिडी आणि सूट मध्ये वाढणारी हेराफेरी आणि गळती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.

UIDAI ने हेही स्पष्ट केले की, पूर्वी आधार कायद्याच्या कलम ७ मधील तरतूदीनुसार जर एखाद्या व्यक्तीकडे आधार नसेल तर तो दुसऱ्या ओळखपत्राद्वारे सरकारी योजना, अनुदान आणि इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतो. पण नव्या परिपत्रकानुसार आता एखाद्याकडे जर आधार नसेल किंवा त्याने आधारसाठी अर्ज केला नसेल तर त्याला इतर कागदपत्रे दाखवूनदेखील सरकारी सूट मिळणार नाही.

सरकारच्या परिपत्रकानुसार, देशातील ९९ टक्के प्रौढांकडे आधार कार्ड असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अजूनही ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल तर त्यांनी आधारसाठी अर्ज करावा आणि रीतसर पावती घ्यावी. जेणेकरून तुम्हाला सरकारी अनुदानाचा लाभ मिळू शकतो, असे आवाहन UIDAI ने केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here