मुंबई : भारतातील अब्जाधीश आणि जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणारे अदाणी समूहाचे गौतम अदाणी Gautam Adani यांनी कंपनीचा महत्त्वाच्या ‘FPO’ बाजारातून काढून घेण्याचा निर्णय गुरुवारी रात्री जाहीर केला. यामुळे अनेकांना याचे आश्चर्य वाटले आणि ज्यांनी या एफपीओची खरेदी केली होती त्या गुंतवणूकदारांनाही याचा खूप मोठा धक्का बसला आहे.Adani समूहाचे FPO काढल्यानंतर Gautam Adani यांची पहिली प्रतिक्रिया आता virul होत आहे.
याचबरोबर एफपीओ खरेदीचे सर्व पैसे गुंतवणूकारांना परत केले जाणार असल्याचे अदानी समूहाने आधीच जाहीर केलेले आहे. परंतु, अदानिंनी असा करण्यामागे नक्की कारण काय? याबाबत आता स्वत: Gautam Adani यांनी पुढाकार घेऊन या गुंतवणूकदारांशी (investors) संवाद साधला. त्यासंदर्भातील अदाणींच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.
अदानी यांनी या व्हिडीओमध्ये असे म्हटले आहे की; शेअर बाजारात Stock Market होणारी हालचाल आणि चढ-उतार पाहून आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे कंपनीचा मुळ हेतू आहे. यामुळे आम्ही ‘एफपीओ’मधून मिळालेले पैसे परत करत असून यासंबंधीचा व्यवहार बंद करत आहोत. माझ्यासाठी गुंतवणूकदारांचं हित प्राथमिक आहे. यासाठी गुंतवणूकदारांना होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी आम्ही ‘एफपीओ’ मागे घेतले आहे. या निर्णयाचा आमचा सध्याचे काम आणि भविष्यातील कामांना काही फरक पडणार नाही असे Gautam Adani म्हणाले.
gautam adani: अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर बाजार वाढला पण अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये घसरण
तसेच सध्या शेअर बाजारात होत असलेल्या हालचाली आणि अदाणी समूहाच्या शेअर्सचा उलटा प्रवास यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता दिसून येत असून कंपनीचं पुढे नक्की कसं होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर देखील अदाणींनी स्पष्टीकरण दिले आहे. ह्या निर्णयामुळे आमच्या आताच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही यापुढेही प्रकल्पांवर वेळेत काम सुरू करून ते पूर्ण करत राहणार आहोत. आमची संपत्ती आणि आर्थिक स्थिरता कायम आहे, असे गौतम अदाणी म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम