Maharashtra flood breaking : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्तांच्या पाठीशी राज्य सरकार राहणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने १० हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. याबाबत आज विधानपरिषदेमध्ये निवेदन सादर केले व राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांना मदत करण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
यावेळी अजित पवार म्हणाले, २३ जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. यवतमाळ, बुलढाणा, वाशीम येथे मोठ्या प्रमाणत नुकसान झालं असून ठिकठिकाणी मंत्र्यांनी भेटी दिल्या आहेत. पूरग्रस्त ठिकाणच्या ११० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी वायूदलची देखील मदत घेण्यात आली होती. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले होते. अशा ठिकाणीं बचाव कार्य करण्यात आले. व ३० लोकांना वाचवण्यात यश आलं आहे.
https://thepointnow.in/pune-breaking/
पूर्णा नदीला पूर आल्याने विविध ठिकाणीं २० ते २५ लोक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यासाठी एनडीआरएफ व एसडीआरएफ यांची मदत घेण्यात आली.
ज्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचे मृत्यू झाले आहेत त्या ठिकाणी मृताच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तातडीने द्यावेत असे आदेश देखील देण्यात आले आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरले होते त्यांना १० हजार रुपये मदत करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
राज्य सरकार नुकसान ग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं सांगत अजित पवार म्हणाले की, ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी स्वस्त धान्याच्या दुकानातून आजच धान्य पुरवठा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले पुराच्या ठिकाणी रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छता करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा देखील करण्यात येणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम