रोहित गुरव
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (ताहाराबाद) : वीज ही शेतकरी वर्गासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. मात्र बागलाण तालुक्याच्या ताहाराबाद येथील माळ शिवारातील शेतकऱ्यांना विजेच्या अभावी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच कारणास्तव शेतकरी वर्गाद्वारे येथे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
शिवारातील विजेचे विद्युत जनित्र जळून 15 ते 20 दिवस झाले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग पिकास पाणीच देऊ शकत नसल्याने, पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. यामुळेच येथे शिवसेना तालूका प्रमुख सुभाष नंदन, सामाजिक कार्यकर्ते अजय पगारे, ग्रामपंचायत सदस्य तुका अहिरे, संदीप साळवे, बबलू अहिरे, आदींनी वीज वितरण अधिकाऱ्यांशी समस्येबाबत चर्चा केली.
दरम्यान, जोपर्यंत नवीन विद्युत जनित्र बसवून दिले जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी निलेश कांकरिया, नितीन घरटे, संजू बलक, अशोक खैरनार, एकनाथ पगारे, योगेश नंदन, अजय पगारे, बबलू अहिरे, वैभव बच्छाव, संदीप टाटिया, मुन्ना सोनार, बंटी गांगुर्डे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम