farmer death: भारनियमनचा देवळा तालुक्यात पहिला बळी; विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

0
36

farmer death : देवळा तालुक्यातील उमराणे येथे कांदा पिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

FD Rate Hike: रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ त्याचे परिणाम झाले FD वर

याबाबत सविस्तर माहिती अशी कि ,उमराणे ता देवळा येथे शुक्रवारी (दि २४) रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास येथील युवा शेतकरी व माथाडी कामगार सुनील तुकाराम देवरे (४०) हा आपल्या शेतात उन्हाळी कांद्याला पाणी भरण्यासाठी गेला असता पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला .कांद्याला पाणी देण्यासाठी गेलेलाआलेला नव्हता. हि घटना आज शनिवारी (२५)रोजी सकाळी सात वाजता विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेला मयत सुनील देवरे याचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगताना दिसून आल्याने एकच खळबळ उडाली .

या घटनेमुळे उमराणे व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा ,एक मुलगी असा लहान परिवार आहे. या घटनेची देवळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . अधिक तपास पोलीस नाईक व्ही पी सोनवणे करीत आहेत .

Prakash ambedkar : ‘२०२४ मध्ये फक्त मुस्लिमच मोदींना रोखू शकतात…’, आंबेडकर

विजेच्या भारनियमनाचा तालुक्यातील पहिला बळी
शेतकरी रात्री बेरात्री कधिही लाइट आल्यावर अर्धवट झोपेतुन उठून शिवारात थंडी, वारा, रानटी जनावरांच्या हल्याची तमा न बाळगता पिकांना पाणी देण्यासाठी जात असतो, काळ्याकुट्ट अंधारात त्याचा तोल जातो, आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. ही अत्यंत गंभीर बाब आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, कांदा उत्पादक शेतकरी संघटना, सातत्याने दिवसा किमान दहा तास सलग लाईट मिळावी म्हणून मागणी करत आहे, शाशन अजुन किती शेतकऱ्यांच्या अंताची वाट पहात आहे. हे कळायला मार्ग नाही.

कुबेर जाधव ,संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना,देवळा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here