‘राव’ हे वागणं बरं नव्हे ! ; भूखंड घोटाळा आरोपात किती तथ्य वाचा सविस्तर

0
29

देवळा: देवळा तालुक्यात सकाळी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली अन् वातावरण ढवळून निघाले, या पोस्टमध्ये अतिशय गंभीर आरोप केलेले असल्याने साहजिक आहे त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया दोघं बाजूंनी उमटल्या आहेत. वाद आहे नगरपंचायत तर्फे भाडे तत्वावर देवळा शहरालगत विठेवाडी रस्त्याला टेकडीवर अनाथालय उभारण्यासाठी ही जागा शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला दिली अन् हा वाद चव्हाट्यावर आला.

मुद्दा असा आहे ही जागा जी दिली आहे ती कायम स्वरुपी नसून 9 वर्षांचा करार असल्याचे शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी दावा केला आहे, तर डी. के. आहेर अनाथालय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी म्हटले की हा आरोप निराधार असून देवळा शहराच्या उन्नतीस यामुळे हातभार लागणार आहे, अनेक निराधार बालकांना हक्काचे घर मिळणार असल्याने हा विरोध होणे दुर्दैवी आहे अस त्यांनी पॉइंट नाऊशी बोलताना संगीतले.

स्वप्नील आहेर यांनी त्यांच्या ‘राव’ या शीर्षक खाली एक पोस्ट व्हायरल केली त्यात त्यांनी गोसावी यांचा तथाकथित बाजारू विचारवंत असा उल्लेख केला आहे. देवळा शहरात भूखंड घोटाळा झाला असून अनाथ आश्रमाच्या नावाखाली जमीन गोसावी यांच्या घशात घातली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे, पुढे जाऊन त्यांनी आदिवासी वस्ती, दलीत वस्ती, कामगार वस्ती यांचे विषय प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. मात्र हा भूखंड घोटाळा भविष्यात कसली पार्टनरशीप असू शकते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच भंगार छाप पुढारी निवडूण दिले की गाव विकले जाते असा गंभीर हल्ला देखील केला आहे. मग ते भंगार पुढारी कोण याचा शोध नागरिक खाजगीत घ्यायला लागले अन् चर्चा सुरू झाली.

राहिला विषय अनाथालयाचा तर आम्ही गोसावी यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितले की, माझ्या तालुक्यात काही वेगळं असावं निराधारांना घर मिळावे हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र चांगल्या कामाला विरोध हे निंदनीय असून आम्ही त्यांना उत्तर देत बसून अंगावर शिंतोडे उडवणार नसल्याचे देखील गोसावी म्हटले, शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टसाठी आम्हाला वाघोली येथे देखील 3 एकर जागा तेथील प्रशासन देण्यास तयार होते मात्र, आम्ही तालुक्याला प्राधान्य दिले कारण देवळा शहराचा नावलौकिक होणे हे आपल्यासाठी महत्वाचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

प्रा. डी के आहेर म्हणाले की नगरपंचायतला पत्र दिले असून सर्व कायदेशीर पूर्तता केली आहे. ही जागा खाजगी नसून भाडे तत्वावर घेतली आहे. त्याठिकाणी वृक्षारोपण केले असून आतापर्यंत ट्रस्ट ने 126 मुलांना दत्तक घेतल आहे. त्यांना राहण्याची व्यवस्था करायची आहे. कारण काही मुलांना राहण्यासाठी घर नाही त्यांचां सांभाळ करण्यासाठी कोणी नाही, त्यांच्या काळजीपोटी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

9 वर्षासाठी ही जागा दिली असून नियमानुसार भाडे तत्वावर ही जागा आहे. सर्व सरकारी नियमानुसार ठरवले असून 3 एकर जागेला मंजुरी दिली असून भविष्यात याठिकाणी हॉस्टेल , वृध्दाश्रम , गोशाळा टप्प्या टप्प्याने सुरू करण्याचा मानस असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

वाचकांनो आम्ही दोघं बाजूचे मत मांडली असून यात सत्य काय हे आपण ठरवले पाहिजे, आपल्याकडे काही पुरावे असल्यास नक्की आमच्या पर्यंत पोहचवा, पण तूर्तास तरी यात आमच्या निदर्शनास घोटाळा असल्याचे दिसत नाही मात्र हे आमचे प्राथमिक निरीक्षण आहे. सरकारी नियमावली सर्व बघता हे आकलन आम्ही केले आहे. तूर्तास चांगल्या कामासाठी शुभेच्छा हेतू चांगला असेल तर कौतुक व पाठिंबा द्यायलाच हवा. आणि काही गैर असेल तर पुराव्यानिशी जनतेसमोर आनावे हीच विनंती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here