देवळा : पिंपळगाव (वा.) ता. देवळा येथील भारती साहेबराव कदम यांच्या गट नंबर ११३२ मधील कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याने कदम यांच्या दोनशे क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे. साठवणूक केलेल्या कांदा चाळीचा उग्र वास येत असल्याने कदम यांनी कांद्याची पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी बाजारभाव मिळत असल्याने भारती कदम यांनी २०० क्विंटल कांदा चाळीत साठवणूक केला. भविष्यात बाजार भावात तेजी आल्यास चाळीतील कांदा विक्री करू व त्यातून संसारासाठी दोन पैसे मिळतील असे स्वप्न कदम कुटुंबीय रंगवत होते. मात्र अज्ञात समाजकंटकांने त्यांच्या साठवणूक केलेल्या कांदा चाळीत युरिया हे रासायनिक खत टाकल्याने कदम कदम कुटुंबीयांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले आहे.
या घटनेमुळे कदम कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वर्षभराचा घरगाडा आता कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. तालुक्यात कांदा चाळीत युरिया टाकण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने, सर्वच या घटने बाबत संताप व्यक्त केला जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम