मुंबई – टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे आज मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघरच्या चारोटी येथे रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या अपघाती निधनाने उद्योगजगतात शोककळा पसरली आहे.
Cyrus Mistry, former Chairman of Tata Sons, while travelling from Ahmedabad to Mumbai, died in a road accident after his car hit a divider. 4 people were present in the car; 2 died on spot & 2 were moved to hospital: Palghar police officials pic.twitter.com/nOlhZcKUZA
— ANI (@ANI) September 4, 2022
टाटा समूहाचे काहीकाळ अध्यक्ष राहिलेले सायरस मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला जात असताना दुपारच्या सुमारास त्यांची कार महामार्गावरील दुभाजकाला धडकली आणि अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला तेव्हा त्या गाडीत ४ जण उपस्थित होते; त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर २ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये सायरस मिस्त्री, जहांगीर दिनशा पंडोल यांचा समावेश असून अनायता पंडोले, दरियस पांडोले हे दोघे गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर चारोटी टोलनाक्याजवळ मुंबईला येताना कार दुभाजकाला आदळून अपघात घडला आहे. पालघरचे पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, वित्तमंत्री निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, टाटा सन्सचे विद्यमान अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, उद्योजक आनंद महिंद्र व उद्योगजगतातील अनेक व्यक्तींनी यावेळी सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सायरस मिस्त्री यांचा अल्पपरिचय
सायरस मिस्त्री हे देशातील एक ख्यातनाम उद्योगपती होते, जे एका ट्रिलियनेअर कुटुंबातील आहे. रिअल इस्टेट व्यावसायिक पालोनजी शापूरजी मिस्त्री यांचे ते धाकटे पुत्र, तसेच ते रतन टाटा यांचे नातेवाईकही होते. ते ५४ वर्षांचे होते. २०१२ साली त्यांनी टाटा सन्सचे अध्यक्षपद भूषवून टाटा सन्सचे तरुण अध्यक्ष बनले होते. २०१६ ला मिस्त्रींना समूहाच्या अध्यक्षपदावरून काढण्यात आले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम