Mumbai : वीज दरांबाबत केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय….

0
50

Mumbai : केंद्र सरकारने वीज दरां संदर्भात संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार वीज दर निश्चित करण्यासाठी ‘टाईम ऑफ डे’ नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे देशभरातील विजेचे व्यवस्थापन केले जाणार असून आता वीज बिलात 20 टक्क्यांपर्यंत बचत करता येणार आहे. यामुळे ‘टाईम ऑफ डे’ या प्रणालीचा ग्राहक आणि वीज पुरवठादारांना निश्चितच फायदा होईल असा विश्वास केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारने राबवलेल्या नवीन प्रणाली अंतर्गत विजेचे दर दिवसा वेगळे आणि रात्री वेगळे दर लागू केले जाणार आहेत. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांना लागू होणाऱ्या दरानुसार शुल्क भरावे लागेल. टी ओडी शुल्क प्रणाली 1 एप्रिल 2024 पासून 10 kW पेक्षा अधिक मागणी असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी लागू होणार आहे. त्यानंतर शेती वगळता इतर सर्व ग्राहकांसाठी हा नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत.

केंद्र सरकार वीज बिल कमी करण्यासाठी नवा फॉर्म्युला आणत आहे. त्यामुळे वीज बिल सुमारे 20 टक्क्यांनी घटू शकणार असून ऊर्जा मंत्रालय नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी हे नियम आणत आहे. त्यानुसार दिवसा वीज 20 टक्के स्वस्त, तर रात्रीच्या वेळी 20 टक्के महाग राहणार आहे. व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी एप्रिल 2024 पासून हे नियम लागू होणार असून सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 6 ते 9 हे तास पिक अवर्स गृहीत धरले जाणार असल्याचं देखील ऊर्जा मंत्रालयाने सांगितलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here