The point now – भारतीय रेल्वेने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. रेल्वेने गेल्या 16 महिन्यांत दर तीन दिवसांनी एका अकार्यक्षम किंवा भ्रष्ट अधिकाऱ्याला काढून टाकले आहे याशिवाय १३९ अधिकाऱ्यांवर स्वेच्छानिवृत्तीसाठी
(व्हीआरएस) दबाव टाकण्यात येत असून ३८अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका दिवसापूर्वीच दोन वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे.
त्यापैकी एकाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हैदराबादमध्ये ५ लाख रुपयांची लाच घेताना पकडले, तर दुसऱ्याला रांचीमध्ये ३ लाख रुपयांसह पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले. एका अधिकाऱ्याने सांगितले की रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव त्यांच्या ‘काम करो नही तो हटो’ या संदेशाबद्दल अगदी स्पष्ट आहेत. आम्ही जुलै 2021 पासून दर तीन दिवसांनी एका भ्रष्ट रेल्वे अधिकाऱ्याला हाकलून दिले आहे. रेल्वेच्या या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
9700 प्रकरणात रेल्वेने 68 लाख वसूल केले, तर दुसरीकडे पूर्व मध्य रेल्वे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर सातत्याने कडक कारवाई करत आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कडक मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व मध्य रेल्वेने 22 नोव्हेंबर रोजी समस्तीपूर विभागात पहाटे 5 ते 11 या वेळेत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली होती. यादरम्यान 9700 गुन्ह्यांमधून एकूण 68 लाख रुपये वसूल करण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम