जळगाव : केळीला (Banana)भाव मिळत नसल्याने शेतकरी(Farmer) चिंतेत होते.त्यात काही दिवसापूर्वी झालेल्या वादळामुळे (Storm)केळी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र आता केळीला चांगला भाव मिळाला असून हा भाव मागील दहा वर्षामधील विक्रमी असल्याचे बोलले जात आहे.
सध्या केळीची आवक फारच कमी झाली असून खानदेश व निमाड प्रांतातील केळी काही ठिकाणीच उपलब्ध आहे. मागच्या वर्षी कुक्कूबर मोझॅक व्हायरस या रोगामुळे शेतकऱ्यांनी केळीबागा उपटून फेकल्या होत्या. त्यामुळे लागवडीत मोठी घट झाली होती. यामुळे केळी मालाची आवक कमी झाली आणि मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या मुळे शेतकरी हवालदील झाला होता.
वादळामुळे ही नुकसान
दा पावसाळच्या आधी आलेल्या वादळामुळे रावेर तालुक्यातील केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक ठिकाणच्या केळीबागा या जमीनदोस्त झाल्याने पुन्हा केळी उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
बऱ्हाणपूर बाजारात विक्रमी भाव
बऱ्हाणपूर बाजारात दोन ट्रक केळीचा लिलाव २ हजार ६९५ व २ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दराने झाला. तर वापसी केळी मालाचा भाव १ हजार २०१ रुपये प्रतिक्विंटल पोहचला आहे. या उच्चांकी भावाने केळी उत्पादक सुखावला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम