वादळी वारा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊसाने शेतकरी मेटाकुटीला

0
45
देवळा तालुक्यातील वाखारी येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात साचलेले पाणी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : गेल्या दोन तीन दिवसांपासून देवळा शहर व तालुक्यात वादळी वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस सुरू आहे. आज परत देवळा तालुक्यातील बहुतांश गांवात चार साडेचार वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला . यात काढणीला आलेल्या द्राक्षबागा, व शेतात उभा असलेला व काढणीला आलेला गहु, हरबरा, ऐन उमेदीत असलेला रब्बी कांदा, तसेच काढून शेतात घोड्या घालून पडलेला लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .

NCP BJP alliance: ठाकरेंना टेन्शन! नागालँडमध्ये राष्ट्रवादी – भाजप साथ साथ

देवळा तालुक्यातील वाखारी येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात साचलेले पाणी (छाया – सोमनाथ जगताप )

वाखारी गावातील चिंचबारी शिवारात गारपीट झाली असून ,दोन दिवसांपूर्वी खर्डे परिसरातील वार्षी ,कांचने आदी भागात तुरळक प्रमाणात गारपीट झाली. कांदा, गहू व इतर या पिकांचे यामुळे नुकसान झाले आहे. आधिच कोणत्याच शेतमालाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात निसर्गाची अवक्रुपा, शाशनाची धरसोड वृत्ती, या दुहेरी तिहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला कोणी वाली नाही . कांदा व इतर शेत मालाला भाव नसल्याने तालुक्यातील माळवाडी येथील शेतकऱ्यांनी गाव विकण्याचा एकमुखी ठराव केल्याने हा विषय सम्पूर्ण राज्यात गाजला गेला .

याचे थेट पडसाद सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील चर्चिला गेला असून , शासनाने याची तात्काळ दखल घेऊन भरपाई द्यावी ,अशी मागणी जोर धरू पहात आहे.

तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्यासह इतर हाता तोंडाशी आलेल्या पिंकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने याची दखल घेऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत जाहीर करावी .
कुबेर जाधव ,समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here