मुंबई – कोरोना महामारीच्या वेळी व त्यानंतर सर्वसामान्य भारतीयांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता जरी वाढली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्रासपणे केले जाणारे ह्या गोळ्यांचे सेवन अपायकारक ठरते.
आता एका अहवालातून हे समोर आले आहे. भारतातील बहुतांश नागरिक कसलाही विचार न करता अँटिबायोटिक औषधे घेत आहे. त्यामुळेच, वर्षभरात तब्बल ५०० कोटी रुपयांची अँटिबायोटिक औषधांची खरेदी भारतीयांनी केली आहेत. ‘लँसेंट’ या आघाडीच्या आरोग्यविषयक नियतकालिकाने आपल्या विभागीय अंकात ही माहिती देण्यात आली आहे.
ज्या काळात भारतात महामारी वरच्या स्थानावर होती, त्या २०१९मध्ये एका वर्षात तब्बल पाचशे कोटी रुपयांच्या अँटिबायोटिक गोळ्या भारतीयांनी घेतल्या. यापैकी अनेक गोळ्यांना अन्न व औषध प्रशासनाची मान्यताही नसल्याचे समोर आले आहे. लँसेंटने देशातील एकूण ९००० औषध दुकानांनी केलेल्या विक्रीच्या माहितीचा आढावा घेऊन हा निष्कर्ष काढला आहे.
कशासाठी घेतात ही औषधे ?
प्रकाशित केलेल्या अहवालाप्रमाणे, भारतीय नागरिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक औषधे घेतात. पण या औषधांचा आपल्या शरीरावर कोणता विपरीत परिणाम होतो, याची कोणतीही माहिती नसते अथवा ते माहित असूनही त्याकडे दुर्लक्ष करतात.
तर साधारणतः अँटिबायोटिक औषधे ही एखाद्या आजारांमुळे निर्माण झालेले जंतू नष्ट करण्यासाठी घेतल्या जातात. खरेतर रुग्णाचा जीव वाचण्यासाठी अँटिबायोटिक औषधे देऊन त्याला बरे केले जाते. पण हजारो भारतीय नागरिक लवकर बरे होण्याच्या उद्देशाने कसलाही विचार न करता अशी औषधे सर्रासपणे घेतात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम